शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

वादळाचा तडाखा; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:45 IST

जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले.

ठळक मुद्देअनेक घरांवरील छप्पर उडाले : आर्वीसह समुद्रपूर परिसरात वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले. यामुळे सुमारे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर गिरड लगतच्या केसलापूर येथील घरांवरील छप्पर उडाले. शेकापूर (बाई), विरूळ आकाली येथील घरांवरील छप्पर उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.रसुलाबाद येथे वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांवरील टीना कवेलू ताडपत्री उडून गेली. शिवाय येथील युवा शेतकरी सागर भोयर यांच्या शेतामधील कुक्कुटपालन केंद्राचा नवा शेड पुर्णत: उडाला. या छतावरील टीना उडून १ किमी अंतरावर जावून पडल्या. या वादळात केवळ छतच उडून गेले नाही तर भिंंतही पडली. यावेळी सागर भोयर केंद्रावर हजर असल्याने ते जखमी झाले. या शेडमध्ये सात दिवसाचे कोंबडीचे पिल्ले होते. ते जखमी झाले तर काहींचा या वादळात मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले.केसलापार येथे घर कोसळलेगिरड : परीसरात गुरुवारी सायंकाळी पावसासोबात आलेल्या वादळाने चांगलाच तांडव मचविला. या वाºयाने कित्येक झाडे, विजेचे खांब जमिनदोस्त झाले. यामुळे गिरड लगतच्या गावांचा विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत झाला होता. केसलापार या गावात रात्री ८ वाजता वादळाने चांगलाच तांडव माजविला. या गावातिल वासुदेव मोघरे, कवडु मोघरे, हरिदास मोघरे, दिलीप धानोरकर, संजय बांगरे, सत्यभामा भोयर, शंकर भोयर, पंढरी भोयर, सुरेश भाबळे, नंदेश्वर लोहकरे, रामा कोसे, संभाजी सातपुडके, महादेव उके, शांताबाई सातपुडके यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले. तर गावातील प्रत्येक घराचे किरकोळ नुकसान झाले. अनेक घरावरील टिना छत उडून घरात पाणी शिरल्याने ठेवलेले धान्य, कपडे, आदिसह जीवनावश्यक सामग्रीचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती तहसील कार्यालयाला देण्यात आली. तलाठी इकबाल अहमद शेख यांनी केसलापार येथील घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला. पं.स. सदस्य लिलाबाई खुरपडे यांनी झालेल्या नकसानीची पाहणी केली. वादळात क्षतिग्रस्त घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस