शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

वादळी पावसाचा तडाखा; घरांची पडझड

By admin | Updated: June 14, 2014 23:46 IST

आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष

प्रचंड नुकसान : झाडे उन्मळून वीज खंडितआर्वी, कारंजा (घा़) : आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष उन्मळून पडल्याने वीज खंडित झाली़कारंजा तालुक्यातील ढगा आणि गारपीट या दोन गावांत गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले़ जंगलव्याप्त गावांत ४० ते ४५ घरांचे छत उडाले. टिनपत्रे व कवेलू उडाल्याने शेकडो ग्रामस्थ उघड्यावर आले. कुडाची घरे जमीनदोस्त झालीत़ गारपीट या गावात ७१ घरे अंशत: पडली़ यात २ लाख ६४ हजारांचे नुकसान झाले़ सहा कोठे अंशत: तर पाच कोठे जमीनदोस्त झाले़ यात ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले़ ३५ ते ४० घरांची पडझड झाली. ढगा गावात ३७ घरे अंशत: पडली़ यात २ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाले़ नुकसानीची पाहणी रात्री नायब तहसीलदार बर्वे, तलाठी व त्यांच्या चमूने केली. आर्वी तालुक्यातही गुरूवारी रात्री वादळी पावसाचे आगमन झाले़ यात नांदपूर, शिरपूर, वर्धमनेरी, खुबगाव, वाठोडा, निंबोली, वागदा, सर्कसपूर, वाढोणा, जळगाव, बाजारवाडा आदी गावांत जोरदार पावसाची नोंद झाली़ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ काही ठिकाणी वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता़ टाकरखेडा येथेही वादळी पावसामुळे अनेकांच्या घरांची टिनपत्रे उडालीत़ वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली़ यामुळे वाहतूक ठप्प होती़ (तालुका प्रतिनिधी)