शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रेल्वेगाड्यांना थांबा द्या; अन्यथा रेलरोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:02 IST

येथील रेल्वे थांब्यावर मागील सहा महिन्यांपासून नागपूर भुसावळ नागपूर, नागपूर अमरावती नागपूर व अजनी काझीपेठ अजनी या पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाचा निर्णय : पॅसेजर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे): येथील रेल्वे थांब्यावर मागील सहा महिन्यांपासून नागपूर भुसावळ नागपूर, नागपूर अमरावती नागपूर व अजनी काझीपेठ अजनी या पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गाड्यांना १८ जुलैपर्यंत पुर्ववत थांबा द्यावा, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन केले जाईल, असा निर्णय महादेव मंदिरात ओमप्रकाश राठी यांच्या अध्यक्षेतत झालेल्या विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाच्या सर्व बैठकीत घेण्यात आला.सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे स्थानकावरुन नागपूर आणि वर्धेकरिता जाणाऱ्या-येणाºया विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी संख्या आहे. मागील सहा महिन्यांपासून तिन्ही पॅसेंजर गाड्या बंद असल्याने शिक्षणाकरीत वर्धा आणि नागपुरला जाणाºया विद्यार्थ्यांना वेळेत महाविद्यालयात पोहोचता येत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच व्यापारी व सर्वसामान्यांनाही या बंद गाड्यांमुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या रेल्वे गाड्या १ जुलैपासून नियमित सुरु करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या गाड्या सुरू केल्या नाही. त्यामुळे या रेल्वे गाड्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाच्यावतीने बैठक आयोजित केली होती. ओमप्रकाश राठी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करुन प्रारंभी रेल्वे गाड्या सुरु करण्याच्या मागणी संदर्भात खासदार रामदास तडस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर कुणावार आणि रेल्वे प्रबंधक नागपूर यांना निवेदन द्यायचे. त्या निवेदनावर १८ जुलैपर्यंत काय कार्यवाही होते याची प्रतीक्षा करायची. जर १८ जुलैपर्यंत या रेल्वेगाड्या पुर्ववत सुरु झाल्या नाही तर रेल्वेरोको आंदोलन करण्याचे. या आंदोलनात विद्यार्थी, व्यापारी मंडळ, क्रीडा मंडळ तसेच सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांचा सहभाग घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाचे अध्यक्ष देवीकिसन भन्साळी, आशिष देवतळे, डॉ. मधुकर कोल्हे यांच्यासह विद्यार्थी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे