शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

विद्यार्थ्यांसह गावकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:57 IST

तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : वेळेवर बस येत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकत्र येवून रस्तारोको केला.यावेळी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एक बस आल्यावर काही विद्यार्थी बसवून घेतले तर उर्वरित विद्यार्थी दुसºया बसच्या प्रतीक्षेत होते. या प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पाठविण्यात आले. शिरकुटणी, ममदापूर, सुजातपूर या तीन गावातील शंभरावर विद्यार्थी आष्टीला शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहे. त्यामुळे वेळेवर परिक्षासाठी जावे लागते. शाळेत गेल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना धारेवर धरतात अशा वेळी विद्यार्थ्यांना दोन्हीकडून मनस्ताप सहन करावा लागतो. गत महिन्याभरापासून सकाळी आर्वी-मोर्शी व आर्वी-वरुड या दोन्ही बस ११.३० ते १२ वाजता येतात तर काही बस आल्यावर थांबा न देता सरळ निघून जातात. त्यामुळे खासगी वाहनांचा आधार घेवून आष्टीला यावे लागते. आर्वी येथील आगार व्यवस्थापक आणि तळेगाव येथील आगार व्यवस्थापक बस येतात एवढे सांगून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज सकाळी ९.३० वाजता ३० ते ४० विद्यार्थी शिरकुटणी काल्याजवळ थांबले. ११.२५ झाले तरी बस आली नाही. मोर्शी आगाराची एनएच ४० ए ८८७५ ही बस आल्यावर थांबली नाही. त्यामुळे वातावरण आणखिच तापले. याचा निषेध करीत लागलीच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून संताप व्यक्त केला. रस्तारोको होताच गावातील नागरिकही आले. दरम्यान आर्वी आगाराची ०८५२ ही बस आली. बसला विद्यार्थी व गावकºयांनी घेराव घातला. चालकाने अर्धे विद्यार्थी बसून नेले. उर्वरित विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत थांबले. रस्तारोको वेळी गावकरी जयराम कोहरे, ईश्वर वाघाडे, कपील श्रीराम, पंकज इरपाचे, दिनेश कुमरे, अंकुश सहारे, शक्ती कोहरे, दिपक निकाळजे, श्याम धोटे, शेषराव गवळीकर, प्रकाश धोटे, विद्यार्थीमध्ये गौरी उईके, हरिष पुसाम, दामिनी खानपासोडे, प्रासिक डोंगरे, चेतन दुधकवरे, सारंग नेहारे, सचिन उकार, गायत्री इरपाची, रणजीत आत्राम, हितेश धुर्वे यांच्यासह गावकºयांनी ठिय्या मांडला होता.