शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसह गावकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:57 IST

तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : वेळेवर बस येत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकत्र येवून रस्तारोको केला.यावेळी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एक बस आल्यावर काही विद्यार्थी बसवून घेतले तर उर्वरित विद्यार्थी दुसºया बसच्या प्रतीक्षेत होते. या प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पाठविण्यात आले. शिरकुटणी, ममदापूर, सुजातपूर या तीन गावातील शंभरावर विद्यार्थी आष्टीला शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहे. त्यामुळे वेळेवर परिक्षासाठी जावे लागते. शाळेत गेल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना धारेवर धरतात अशा वेळी विद्यार्थ्यांना दोन्हीकडून मनस्ताप सहन करावा लागतो. गत महिन्याभरापासून सकाळी आर्वी-मोर्शी व आर्वी-वरुड या दोन्ही बस ११.३० ते १२ वाजता येतात तर काही बस आल्यावर थांबा न देता सरळ निघून जातात. त्यामुळे खासगी वाहनांचा आधार घेवून आष्टीला यावे लागते. आर्वी येथील आगार व्यवस्थापक आणि तळेगाव येथील आगार व्यवस्थापक बस येतात एवढे सांगून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज सकाळी ९.३० वाजता ३० ते ४० विद्यार्थी शिरकुटणी काल्याजवळ थांबले. ११.२५ झाले तरी बस आली नाही. मोर्शी आगाराची एनएच ४० ए ८८७५ ही बस आल्यावर थांबली नाही. त्यामुळे वातावरण आणखिच तापले. याचा निषेध करीत लागलीच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून संताप व्यक्त केला. रस्तारोको होताच गावातील नागरिकही आले. दरम्यान आर्वी आगाराची ०८५२ ही बस आली. बसला विद्यार्थी व गावकºयांनी घेराव घातला. चालकाने अर्धे विद्यार्थी बसून नेले. उर्वरित विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत थांबले. रस्तारोको वेळी गावकरी जयराम कोहरे, ईश्वर वाघाडे, कपील श्रीराम, पंकज इरपाचे, दिनेश कुमरे, अंकुश सहारे, शक्ती कोहरे, दिपक निकाळजे, श्याम धोटे, शेषराव गवळीकर, प्रकाश धोटे, विद्यार्थीमध्ये गौरी उईके, हरिष पुसाम, दामिनी खानपासोडे, प्रासिक डोंगरे, चेतन दुधकवरे, सारंग नेहारे, सचिन उकार, गायत्री इरपाची, रणजीत आत्राम, हितेश धुर्वे यांच्यासह गावकºयांनी ठिय्या मांडला होता.