शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

आर्वीनाका चौकातील बेढब बांधकाम थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम करणे हा नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे ठरेल, त्यामुळे बेढब बांधकाम तत्काळ काढावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता फोरमने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम करणे हा नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे ठरेल, त्यामुळे बेढब बांधकाम तत्काळ काढावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता फोरमने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून केली.  आर्वी नाका ते कारला रस्त्यावर आठ ते दहा मंगलकार्यालये आहेत. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, जाजू ग्रामीण महाविद्यालय आदी आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधात वा हद्दीत पुतळा न लावण्याबाबत निर्देशित केले आहे. पुतळा लावण्याची परवानगी कार्यकारी अभियंता देतील असे नमूद केले आहे. आर्वी नाका चौकात बेढब बांधकाम सुरू असून, दोन बाय दोन फुटाच्या कॉलमवर पुतळा बसविल्यास व्हिजन ऑबस्ट्रॅक होणार नाही किंवा कारला चौकापर्यंत उजव्या बाजूला १०० फुट रुंदीच्या सर्व्हिसरोडसाठी शजागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी पुतळा बसविल्यास कार्यक्रम घेण्यासही जागा होईल, त्यामुळे ते बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी प्र. ग. वानखेडे, शेळके, वि. वि. गुज्जेवार, व्ही. पी. श्रीगोड, वि. बा. बोभाटे, एस. एस. जुमडे, बकाने आदींनी केली.

वाहतुकीस अडथळा झाला नित्याचाच- आर्वीनाका परिसरात आधीच रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते तसेच हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले असून दररोज वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पोलीस, नगरपालिका प्रशासनाला याबाबत अनेकदा अवगत करुनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. याचा विचार करुन हे बेढब बांधकाम थांबविण्यात यावे.

पर्यायी जागा उपलब्ध करा

- आर्वी नाका ते कारला चाैकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली असून सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. याच मार्गावर महाविद्यालयांसह मंगल कार्यालये असल्याने रस्त्याकडेला बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. याकडेही पालिकेने गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली असून लक्ष देणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग