शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीनाका चौकातील बेढब बांधकाम थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम करणे हा नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे ठरेल, त्यामुळे बेढब बांधकाम तत्काळ काढावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता फोरमने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम करणे हा नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे ठरेल, त्यामुळे बेढब बांधकाम तत्काळ काढावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता फोरमने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून केली.  आर्वी नाका ते कारला रस्त्यावर आठ ते दहा मंगलकार्यालये आहेत. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, जाजू ग्रामीण महाविद्यालय आदी आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधात वा हद्दीत पुतळा न लावण्याबाबत निर्देशित केले आहे. पुतळा लावण्याची परवानगी कार्यकारी अभियंता देतील असे नमूद केले आहे. आर्वी नाका चौकात बेढब बांधकाम सुरू असून, दोन बाय दोन फुटाच्या कॉलमवर पुतळा बसविल्यास व्हिजन ऑबस्ट्रॅक होणार नाही किंवा कारला चौकापर्यंत उजव्या बाजूला १०० फुट रुंदीच्या सर्व्हिसरोडसाठी शजागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी पुतळा बसविल्यास कार्यक्रम घेण्यासही जागा होईल, त्यामुळे ते बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी प्र. ग. वानखेडे, शेळके, वि. वि. गुज्जेवार, व्ही. पी. श्रीगोड, वि. बा. बोभाटे, एस. एस. जुमडे, बकाने आदींनी केली.

वाहतुकीस अडथळा झाला नित्याचाच- आर्वीनाका परिसरात आधीच रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते तसेच हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले असून दररोज वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पोलीस, नगरपालिका प्रशासनाला याबाबत अनेकदा अवगत करुनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. याचा विचार करुन हे बेढब बांधकाम थांबविण्यात यावे.

पर्यायी जागा उपलब्ध करा

- आर्वी नाका ते कारला चाैकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली असून सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. याच मार्गावर महाविद्यालयांसह मंगल कार्यालये असल्याने रस्त्याकडेला बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. याकडेही पालिकेने गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली असून लक्ष देणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग