शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डसाठी तहसीलमध्ये ठिय्या

By admin | Updated: January 25, 2017 01:03 IST

शासनाने केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य देणे बंद केले आहे. केवळ जमिनीचा सातबारा असल्यासह केशरी शिधापत्रिका देण्यात यावी,

वंचित ग्रामस्थांचे आंदोलन : जमीन नाही तर सातबारा आणणार कुठून वर्धा : शासनाने केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य देणे बंद केले आहे. केवळ जमिनीचा सातबारा असल्यासह केशरी शिधापत्रिका देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय जुन्या शिधापत्रिकाही बाद ठरविल्या आहे. परिणामी, सातबारा नसलेल्या नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याविरूद्ध कुरझडी (जामठा) येथील वंचित ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने केशरी कार्डधारक नागरिकांचा धान्य पुरवठा बंद केला. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्या योजनांचा गरजूंना लाभ मिळत नाही. आता शासनाच्या अजब निर्णयाचा गोरगरीब नागरिकांना फटका बसत आहे. शासनाने जमीन व सातबारा तसेच अपंगत्व असेल तरच केशरी शिधापत्रिका मिळतील, असा वटहुकूमच जारी केला आहे. या प्रकारामुळे गोरगरीब, भूमीहीन, हातावर आणून पानावर खाणाऱ्या नागरिकांना जगणे स्वस्त धान्य मिळेणासे झाले आहे. जुने कार्ड बाद केले असून नवीन कार्डही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. कुरझडी येथील सुमारे ३० ते ४० गरजू कुटुंबियांकडे जुन्या शिधापत्रिका आहे; पण त्यांना सातबारा नसल्याने नवीन शिधापत्रिका मिळत नाहीत. यामुळे ते शासनाच्या स्वस्त धान्य योजनेपासून वंचित आहेत. दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात धान्यसाठा मिळणे क्रमप्राप्त आहे. स्वस्त धान्य दुकानदारास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकरणी योग्य कार्यवाही करीत कुरझडी (जामठा) येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शोषित जनआंदोलन आझाद युवा संघटन व ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनता प्रवीण ढाले, दिनबाजी उघडे, नरेश चौधरी, सुरेश सोनटक्के, दशरथ राठोड, गलांडे, सुलोचना नलांडे यासह ग्रामस्थांनी सहभाग घेत व्यथा मांडल्या.(कार्यालय प्रतिनिधी) केशरी कार्डधारकांना सरसकट वगळणे अयोग्य केशरी, शुभ्र आणि पिवळे अशा तीन प्रकारच्या शिधापत्रिका शासनाकडून जारी केल्या जातात. शुभ्र रेशन कार्ड अंत्योदय, पिवळे बीपीएल तर केशरी कार्ड एपीएल धारकांना दिले जात होते. यातील बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नवीन कार्ड व धान्य साठा सुरळीत दिला जात आहे; पण एपीएल कार्ड धारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. आता तर गरीब असो वा नसो, सातबारा असेल वा अपंगत्व असेल तरच केशरी कार्ड व धान्य दिले जाईल, असा अफलातून निर्णय घेतला असून तो अयोग्य आहे.