शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन सुरूच

By admin | Updated: May 16, 2017 01:20 IST

शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.

कामगारांच्या मागण्यांचा तिढा कायमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. सदर कामगाराला तात्काळ कामावर घेण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी रविवार ७ मे पासून संस्कार अ‍ॅग्रोप्रोसेसमधील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ रोजी कामबंद आंदोलनाच्या आठव्या दिवशीही कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. कुठलीही पूर्व सूचना न देता सदर कंपनी प्रशासनाने जवळपास ४० कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप करीत हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. कुठलीही सुचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवार ७ मे पासून प्रहारच्या नेतृत्त्वात कंपनीतील जवळपास ३५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे गजु कुबडे, शहर प्रमुख विकास दांडगे करीत असून आंदोलनात दादा बोरकर, प्रशांत घोडखांदे, नितीन काटकर, उमेश ठाकरे, सुधाकर भोमले, दिवाकर भोभरे, राजु सेलेकर, प्रशांत वेले, ज्योती यादव, वंदना भोयर आदी सहभागी झाले आहे.भरायला लावला फॉर्मसंस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील चार कामगारांचे प्रकरण कामगार न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवार १२ मे ला सदर चार कामगार वगळता इतर सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, असे निर्देश कामगार न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने १३ मे ला कामगार कामावर गेले असता कामगारांना एक फार्म भरून देण्यास सांगण्यात आले. परंतु, कंपनी प्रशासनाचा हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाला बगल देणारा असल्याचा आरोप करीत कामगार कामावर रुजू झाले नाही. शासकीय नियमानुसार आपली कंपनी कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला देते. ज्या दिवशीपासून आंदोलन सुरू करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला मागण्यांचे कुठलेही लेखी निवेदन प्राप्त झाले नाही. सुरूवातीला कामावरून कमी करण्यात आलेल्या चार कामगारांना कामावर घ्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे असे कळले होते;पण आता कामगार न्यायालयानेही त्यावर मार्गदर्शनात्मक निर्देश दिले आहेत. सध्या कामगारांची काय मागणी आहे त्याची आपणाला कल्पना नाही.- डॉ. कैलास सिंघानिया, संचालक संस्कार अ‍ॅग्रो.पो. वायगाव (नि.)