शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पिपरी मेघे परिसरात ‘जागते रहो’

By admin | Updated: October 25, 2014 22:46 IST

आठवडाभरापूर्वी शुक्रवारी रात्रीच्या सुमारात शहराजवळील पिपरी (मेघे) परिसरातील प्रगतीनगर, गांजरे ले-आऊट व सिंदी (मेघे) परिसरातील वृंदावननगर तसेच नागठाणा शिवारात २० ते २५ चोरट्यांनी

वर्धा : आठवडाभरापूर्वी शुक्रवारी रात्रीच्या सुमारात शहराजवळील पिपरी (मेघे) परिसरातील प्रगतीनगर, गांजरे ले-आऊट व सिंदी (मेघे) परिसरातील वृंदावननगर तसेच नागठाणा शिवारात २० ते २५ चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी रात्रभऱ्यात तब्बल नऊ घरफोड्या केल्या. यात सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागठाणा परिसरातील एका महिलेला मारहाण करण्यात आली. अद्यापही अनेक चोरट्यांचा सुगावा लागलेला नसल्याने या परिसरांमध्ये जागते रहो अशी स्थिती असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दिवाळसणाच्या सुरुवातीलाच चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सण असल्याने प्रत्येकाच्याच घरी थोडा तरी पैसा हा असतोच. नेमकी हीच संधी साधत एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल नऊ ठिकाणी दरोडा घालत पोबारा केला. तसेच चोरी करून लगेच पळून जाता येईल अशाच घरात चोरी केल्याने निदर्शनास आले. अद्यापही यातील काही चोरटे फरार आहेत. त्यामुळे पुन्हा चोरी होईल या भीतीने नागरिकांची दिवाळी भीतीच्या सावटात आणि अर्धवट झोपेतच जात आहे. शहरानजीकच्या पिपरी (मेघे) तसेच सिंदी मेघे परिसरात या काही वर्षात लोकवस्ती वाढली आहे. नवनवीन ले-आऊट तयार झाले आहे. शहरात जागा मिळत नसल्याने अनेकांनी या भागात घरे बांधली आहेत. बरीच घरे या भागात बांधली गेली असली तरी त्या मानाने स्ट्रीट लाईटची व्यवस्था योग्य पद्धतीने आढळत नाही. तसेच हा भाग शहरालगत येत असला तरी तो ग्रामपंचायत भागात येत असल्याने पोलीस प्रशासनाचीही तितकीशी गस्त या परिसरात नसते. तसेच हा परिसर हायवेला लागून असल्याने चोरट्यांसाठी या भागात चोरी करून पळून जाणे हे सोयीचे ठरते. त्यामुळे या भागात चोरीच्या घटना या वारंवार घडत असतात. वस्ती वाढली असली तरी ती विरळ आहे. पक्के रस्ते सर्वत्र झालेले नाही. अनेक ले आऊट खाली आहेत. त्यामुळे एका घरात चोरी होत असली तरी त्या आवाजाची भनक बाजूच्या घरापर्यंत जातेच असे नाही. या कारणाने येथे चोरी करणे चोरींंना सोयीचे होते. सध्या दिवाळीचे दिवस आहेत. त्यामुळे घरे जरी रोषणाईने सजली असली तरी परिसरातील रस्त्यांवर मात्र अंधारच पहावयास मिळतो. सध्या वातावरण शांत असले तरी चोरी केव्हा होईल हे सांगता येत नाही. दिवाळीला बहुतेकांना सुट्ट्या असल्याने नागरिक बाहेरगावी जाण्याचा विचार करतात. परंतु चोरीचे सत्र सुरू असल्याने घर बंद करून बाहेरगावी जावे कसे असा प्रश्न पडला आहे. चोरी करणारे एकाएकी चोरी करीत नसून घरी कोण असतं, बाहेर कोण जातं, अशा अनेक बाबींची माहिती चोरट्या पद्धतीने घेत असतात. अशा वेळी म्हातारी माणसेच घरात आहेत अशी संधी मिळतात चोरी करीत असल्याची बरीच उदाहरणे पहावयास मिळत आहे. तसेच आठवडाभरापूर्वी झालेल्या दरोड्यात तसेच या आधीही शहरासह ग्रामीण भागात झालेल्या दरोड्यात अनेकांवर धारदार शस्त्राने हल्लाही करण्यात आला आहे. त्यामुळेही केवळ म्हातारी माणसे किंवा महिलांना घरात ठेवून बाहेरगावी जाणेही धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे दिवाळीला कुठेही न जाता रोषणाई लवकर बंद करून घरात अर्धवट जागे राहण्यातच पिपरी व सिंदी (मेघे) परिसरातील नागरिक धन्यता मानत आहे. एकाच रात्री तब्बल नऊ दरोडे पडूनही अद्याप ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच हा प्रकार घडल्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालणे, पेट्रोलिंग करणे गरजेचे असतानाही ते चांगल्या प्रकारे होताना दिसत नाही. या सर्व कारणाने परिसरात नागरिकांमध्यी भीतीचे वातावरण असून जागते रहो अशी स्थिती दिसून येत आहे. तसेच दरोड्याच्या घटनांवरून चोरटे हिंसक असल्याचे लक्षात येत असल्याने जीवाला धोका आहे.(शहर प्रतिनिधी)