शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

बंदीस्त असलेला महात्मा गांधींचा पुतळा अखेर हटविला

By admin | Updated: February 7, 2015 01:23 IST

सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता.

वर्धा : सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता. गत ३० वर्षांपासून बांधून असलेला हा पुतळा अखेर गावकऱ्यांच्या मागणीवरून शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हलविण्यात आला. याबाबत थोडक्यात वत्त असे की, येथील ग्रामपंचायतीच्या परिसरात तत्कालीन मुख्यमंत्री वसंत नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९७० रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सन १९९५-९६ मध्ये एका अज्ञात समाज कंटकाने मध्यरात्री दगड मारून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती. यावरून शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासन विरूद्ध गावकरी, शिवसैनिक यांच्यात दंगल घडून आली होती. तेव्हापासून हा पुतळा झाकून ठेवला होता. अशातच ६ डिसेंबर २०१४ रोजीच्या ग्रामसभेत हा पुतळा हलविण्याबाबत ठराव घेण्यात आला. ठरावाची प्रत सरपंच गीता झाडे, ग्रा. पं. सदस्य आशिष कुचेवार, ग्रामविकास अधिकारी व्ही. जी. जोगे यांच्यासह गावकऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली. सदर प्रांगणामध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असल्याने नवप्रवाह संस्था द्वारा संचालीत न्यु स्टार स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान निर्णय घेत अखेर आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार प्रिती डुडुलकर, सरपंच गीता झाडे, उपसरपंच राम मेहत्रे, तलाठी शैलेष देशमुख, ग्राम विस्तार अधिकारी जोगे, पोलीस पाटील महेश टेकाम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांना श्रद्धाजंली अर्पण करून त्यांचा पुतळा काढून प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आला.(प्रतिनिधी)