शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोड थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन, आमचा विरोध विनाशाला, विकासाला नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 17:59 IST

मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.

वर्धा - सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी ७० मोठ्या वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. याशिवाय आणखी सुमारे १०० वृक्ष तोडले जाणार आहेत. हे वृक्ष वाचविण्यासाठी सदर रस्ता चौपदरी न करता दोन्ही बाजूने थोडा लहान करावा, अशी मागणी करणारे निवेदन वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग असणाऱ्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना देण्यात आले. सध्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे रस्ता रुंदीकरण होणाऱ्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेणे सुरू आहे. गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम या सुमारे चार किलोमीटर मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. हा रस्ता चौपदरी झाल्यास स्वाभाविकच वाहनांचा वेग वाढेल आणि अपघातांचे प्रमाणही वाढेल. आमच्या मुलाबाळांचा जीव धोक्यात आणणारा चौपदरी रस्ता आम्हाला नको. उलट दोन किंवा तीन पदरी रस्ता करून दुतर्फा असलेले वृक्ष वाचवावेत, अशी मागणी करणाऱ्या या निवेदनावर या परिसरातील हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र हा विकास पर्यावरणाला हानी पोहचविणारा नसावा तर गांधी जिल्ह्याच्या शांतिप्रियतेचा आणि साधेपणाचा गौरव वाढविणारा असावा, अशी भूमिका या समितीने घेतली आहे. ज्या भागातील झाडे आधीच तोडल्या गेली आहेत तेथे नियमानुसार त्वरीत वृक्षारोपण करावे, मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.जिल्हाधिकाऱ्यांना सदर निवेदन देताना सुषमा शर्मा, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, डाॅ. आलोक बंग यांनी वृक्ष बचाओ नागरी समितीची बाजू मांडली. यात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, डाॅ. सचिन पावडे, युवराज गटकळ, डाॅ. अभ्युदय मेघे, डाॅ. आरती गगने व समिती सदस्य उपस्थित होते._____________

स्वातंत्र्यदिनी तरुणाईचे वृक्ष वाचवा आंदोलनएकीकडे वृक्ष वाचवून वर्धा सेवाग्राम हा मार्ग 'शांतिपथ' व्हावा, अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणतज्ज्ञ, गांधीविचारक मांडत आहेत. तर दुस-या बाजूने या वृक्षतोडीचा तसेच अनावश्यक रस्ता रुंदीकरणाचा विरोध म्हणून तरुणाईही आता रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी ८.३० ते ११ या दरम्यान तोडलेल्या तसेच कटाईकरिता चिन्हांकित केलेल्या वृक्षांजवळ फलक घेऊन उभे रहात युवकयुवती वृक्षकटाईला आपला विरोध दर्शविणार आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच विविध सामाजिक, निसर्गप्रेमी व युवा संघटनांही सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, अद्वैत देशपांडे, शूचि सिन्हा, डाॅ. अनुपमा गुप्ता, अक्षद सोमनाथे, मनोज ठाकरे, डाॅ. मृत्युंजय, शिशीर देशमुख, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, राहुल तेलरांधे, मोहित सहारे, दर्शन दुधाने, गुरुराज राऊत आदींनी केले आहे._____________

मानवी वस्तीतून जाणारे चौपदरी रस्तेच अपघातांना कारणीभूत ठरतात, याबाबत अनेक तज्ज्ञांनी मांडणी केली आहे. गरज नसतानाही विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर रस्ते रुंदीकरणाचा आग्रह का धरला जातो, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गांधी फाॅर टुमारो ही संकल्पना रस्ते अतिभव्य केल्याने नव्हे तर संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न केल्यानेच पूर्णत्वाला जाईल.