शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोड थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन, आमचा विरोध विनाशाला, विकासाला नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 17:59 IST

मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.

वर्धा - सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी ७० मोठ्या वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. याशिवाय आणखी सुमारे १०० वृक्ष तोडले जाणार आहेत. हे वृक्ष वाचविण्यासाठी सदर रस्ता चौपदरी न करता दोन्ही बाजूने थोडा लहान करावा, अशी मागणी करणारे निवेदन वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग असणाऱ्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना देण्यात आले. सध्या वृक्ष बचाओ नागरी समितीद्वारे रस्ता रुंदीकरण होणाऱ्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेणे सुरू आहे. गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम या सुमारे चार किलोमीटर मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. हा रस्ता चौपदरी झाल्यास स्वाभाविकच वाहनांचा वेग वाढेल आणि अपघातांचे प्रमाणही वाढेल. आमच्या मुलाबाळांचा जीव धोक्यात आणणारा चौपदरी रस्ता आम्हाला नको. उलट दोन किंवा तीन पदरी रस्ता करून दुतर्फा असलेले वृक्ष वाचवावेत, अशी मागणी करणाऱ्या या निवेदनावर या परिसरातील हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र हा विकास पर्यावरणाला हानी पोहचविणारा नसावा तर गांधी जिल्ह्याच्या शांतिप्रियतेचा आणि साधेपणाचा गौरव वाढविणारा असावा, अशी भूमिका या समितीने घेतली आहे. ज्या भागातील झाडे आधीच तोडल्या गेली आहेत तेथे नियमानुसार त्वरीत वृक्षारोपण करावे, मानवी जीवनाला अपायकारक ठरणारे निर्णय टाळावेत, विकासकामे ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावीत, आदी महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात आहेत.जिल्हाधिकाऱ्यांना सदर निवेदन देताना सुषमा शर्मा, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, डाॅ. आलोक बंग यांनी वृक्ष बचाओ नागरी समितीची बाजू मांडली. यात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, डाॅ. सचिन पावडे, युवराज गटकळ, डाॅ. अभ्युदय मेघे, डाॅ. आरती गगने व समिती सदस्य उपस्थित होते._____________

स्वातंत्र्यदिनी तरुणाईचे वृक्ष वाचवा आंदोलनएकीकडे वृक्ष वाचवून वर्धा सेवाग्राम हा मार्ग 'शांतिपथ' व्हावा, अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणतज्ज्ञ, गांधीविचारक मांडत आहेत. तर दुस-या बाजूने या वृक्षतोडीचा तसेच अनावश्यक रस्ता रुंदीकरणाचा विरोध म्हणून तरुणाईही आता रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी ८.३० ते ११ या दरम्यान तोडलेल्या तसेच कटाईकरिता चिन्हांकित केलेल्या वृक्षांजवळ फलक घेऊन उभे रहात युवकयुवती वृक्षकटाईला आपला विरोध दर्शविणार आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच विविध सामाजिक, निसर्गप्रेमी व युवा संघटनांही सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, अद्वैत देशपांडे, शूचि सिन्हा, डाॅ. अनुपमा गुप्ता, अक्षद सोमनाथे, मनोज ठाकरे, डाॅ. मृत्युंजय, शिशीर देशमुख, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, राहुल तेलरांधे, मोहित सहारे, दर्शन दुधाने, गुरुराज राऊत आदींनी केले आहे._____________

मानवी वस्तीतून जाणारे चौपदरी रस्तेच अपघातांना कारणीभूत ठरतात, याबाबत अनेक तज्ज्ञांनी मांडणी केली आहे. गरज नसतानाही विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावावर रस्ते रुंदीकरणाचा आग्रह का धरला जातो, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गांधी फाॅर टुमारो ही संकल्पना रस्ते अतिभव्य केल्याने नव्हे तर संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न केल्यानेच पूर्णत्वाला जाईल.