शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

महावीर बालोद्यानावर झुडुपी जंगलाचे राज्य

By admin | Updated: November 2, 2015 01:39 IST

रामनगर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वृद्धांचा विरंगुळा व्हावा यासाठी येथील पाण्याच्या टाकीजवळ भगवान महावीर उद्यान व बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली;...

कीर्ती स्तंभाला झाडांचा विळखा : खेळण्याचे साहित्यही आले मोडकळीसवर्धा : रामनगर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वृद्धांचा विरंगुळा व्हावा यासाठी येथील पाण्याच्या टाकीजवळ भगवान महावीर उद्यान व बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली; पण आजघडीला येथील बालोद्यानाला तसेच उद्यानाची मूळ ओळख असलेल्या कीर्ती स्तंभाला पूर्णपणे झुडपी झाडांनी वेढले आहे. एवढेच नव्हे तर बालोद्यान असलेला फलकही घाणीच्याच ढिगाऱ्यात असल्याचे दिसते. एकंदरीत स्थिती पाहता शहरातील सर्वच उद्यान व बालोद्यानासाठी केलेला खर्च हा व्यर्थ झाल्याचेच निदर्शनास येते. शहरातील एकही उद्यान आज सुस्थितीत नाही. अशीच अवस्था भगवान महावीर बालोद्यानाचीही झाली आहे. येथे असलेली लहान मुलांची खेळणी ही मोडकळीस आली आहे. पाळणे पूर्णत: तुटलेले आहे. त्यामुळे उद्यानात दाखल झाल्यावर येथे बालोद्यान कुठे असे विचारल्यास ते शोधूनही सापडणार नाही. सर्वच खेळण्यांभोवती झुडपी झाडे उगवली आहे. त्यामुळे लहान मुलेच काय मोठी माणसेही येथे फिरकत नाही. बालोद्यान सुस्थितीत आणण्यासाठी आजवर नगर परिषद प्रशासनाद्वारे अनेक प्रयत्न झाले. तरीही या बालोद्यानाची दुरवस्था कायम असून काही दिवसात ही स्थिती आणखी बिकट होणार असल्याचे दिसते. त्यामुळे मुलांनी खेळावे कुठे हा प्रश्न शेवटी उरतोच.(शहर प्रतिनिधी)रात्रीला चालतात अवैध धंदेमहावीर बालोद्याची दुरवस्था झाल्याने याचा कोणताही उपयोग सध्या लहान मुलांना होत नसला तरी मद्यप्राशन व अवैध धंदे करीत असलेल्यांसाठी मात्र ही जागा आता मोक्याची झाली आहे. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार येथे घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत असतात. लोकप्रतिनिधीही उदासीनउद्यानाची स्वच्छता होत नसल्याने झुडपी झाडे वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास तसेच येथील नागरिकांनाही सहभाग दिल्यास उद्यानाचे मूळ सौंदर्य परत मिळू शकते. परंतु लोकप्रतिनिधी आणि येथील नागरिकांच्या उदासीनतेमुळे ही दुरवस्था झाल्याचे दिसते. बालोद्यानाचा फलकच उकिरड्यातबालोद्यान येथे असल्याची माहिती देणारा फलकच उकिरड्यात आहे. या फलकाला लागूनच सिमेंटची पायली व लोखंडी कंटेनर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फलकाची दुरवस्था तर झाली आहेच पण विशेष म्हणजे कचरा टाकण्यासाठी दोन दोन सुविधा असतानाही कचरा मात्र या दोहोंच्या मधात खाली जागेत टाकला जातो. कचराकुंडीचा उपयोगही होत नसताना फलकाची दुरवस्था होत आहे. वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याची जागाच नाहीलहान मुलांसोबत वयोवृद्धांनाही विरंगुळा व्हावा यासाठी शहरातील बहुतेक उद्यानाप्रमाणेच रामनगर येथील भगवान महावीर उद्यान व बालोद्यान निर्माण करण्यात आले. परंतु येथील झुडपी जंगलांचे राज्य पाहून कुणीही वृद्ध या परिसरात फिरकत नसल्याचे वास्तव आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकावाढलेल्या झुडपांमुळे या परिसराताला अवकळा आली आहे. झुडपी जंगलांमुळे येथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असण्याचा धोका आहे. साप, विंचू, असे प्राणी येथे असल्याची शक्यता या झुडपांमुळे नाकारता येत नाही.

उद्यानातील साहित्य मोडकळीस मुलांना खेळण्यासाठी येथे काही साहित्य ठेवण्यात आले होते. परंतु यातील बहुतांश खेळणी ही मोडकळीस आली आहे. पाळणे पूर्णत: तुटले असून त्यांचे खांबही जंगले आहे. तसेच त्यालाही झुडपी झाडांचा विळखा आहे.

स्तंभालाही गवताचा विळखाभगवान महावीरांच्या नावाने या बालोद्यानाची निर्मिती करण्यात आल्याने येथे भगवान महावीर कीर्ती स्तंभाची उभारणी करण्यात आली. यावर महावीरांची काही वचनेही कोरण्यात आली. परंतु ही वचनेही झुडपी गवतांमध्ये आज दिसेनासी झाली आहे.