शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

राज्य शासनाने सहकारी बँकेची आर्थिक मदतीतील अट मागे घ्यावी

By admin | Updated: July 16, 2014 00:22 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सीआरएआर व्यवस्थीत करण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासनाच्या निर्णयातील रक्कम देण्याच्या संबंधात उच्च न्यायालयाने बँकेच्या

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सीआरएआर व्यवस्थीत करण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासनाच्या निर्णयातील रक्कम देण्याच्या संबंधात उच्च न्यायालयाने बँकेच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर शासनाने यावर विचार करू अशी भूमिका घेतली. यामागील शासनाची भूमिका स्पष्ट करावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यानुसार शासनाने ही अनावश्यक अट मागे घ्यावी व बँकेला आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आयुक्त सहकार विभाग, महाराष्ट्र यांनाही पाठविण्यात आल्या आहे.जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिजर्व बँकेच्या आदेशाच्या स्थगनादेशासाठी विनंती अर्ज केला होता. राज्य शासनाच्यामार्फत जिल्हा सहकारी बँकेला आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने न्यायालयात ३० मे २०१४ ला दिल्यानंतर न्यायालयाने रिजर्व बँकेच्या आदेशाला ठेविदारांचे हित व इतर सर्व समावेशक घटकांचा विचार करून तात्पुरता स्थगनादेश दिला आहे.राज्य शासनाने यावर विचार करून विदर्भातील वर्धा, बुलढाणा व नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकांची तरलता व्यवस्थित करण्यासाठी या तीन बँकांना ३१९ कोटी रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव ४ जून २०१४ ला मंत्रिमंडळात केला. यात वर्धा सहकारी बँकेला १०२ कोटी रुपये देणे आहे. परंतु राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये या परवाना नसलेल्या बँकांना त्याचा सीआरएआर किमान चार टक्के होण्यासाठी शासकीय भागभांडवलाचे स्वरुपात अर्थसहाय्य उपलब्ध करण्यास मंजुरी देताना उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २४९५/२०१४, २४९२/२०१४, २४९४/२०१४ संदर्भात बँकांच्या बाजूने निर्णय दिला. यानंतरच रिजर्व बँकेने परवाना देण्याची तयारी कळविल्यानंतरच अर्थसहाय्य वितरीत करण्यात यावे, असे क्रमांक-१ च्या शासन निर्णयात नमूद केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाच्या या जर-तर च्या भाषेवर आक्षेप नोंदवला असून शासनाची बँकांना आवश्यक रक्कम देण्याबाबत स्पष्ट भूमिका काय अशी सूचना केली आहे. ठेविदारांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)