शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जलसंधारण अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:59 IST

अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

ठळक मुद्देसोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती : सेलू येथे कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतसेलू : अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाचे प्रमाणही देशात व राज्यात कमी होत आहे. अशा परिस्थितीत नियोजन होणे आवश्यक आहे. याच हेतुने सेलू येथे विद्याभारती महाविद्यालयाच्यावतीने जलसंधारण चळवळ उभी करण्यात आली आहे. सोमवारी सिनेतारका सोनाली कुळकर्णी यांच्या उपस्थितीत येथील विद्याभारती महाविद्यालयातून जलसंधारण अभियानास प्रारंभ करण्यात आला.जलसंधारण अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार दत्ता मेघे, विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर, आ.डॉ. पंकज भोयर, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे, प्राचार्य डॉ. संजय कानोडे, अ‍ॅड. शितल भोयर, डॉ. पावडे उपस्थित यांची उपस्थिती होती.आ.डॉ. भोयर म्हणाले की, या अभियानासाठी सेलू तालुक्याची निवड झाली ही भुषणावह बाब आहे. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. परंतु त्या तुलनेत पाणी जमिनीत जिरविण्यासंदर्भात कोणतेच कार्य आजपर्यंत झाले नाही. त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य नागरिकही भोगत आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे. या लोकाभिमुख चळवळीत युवक युवतींनी सहभाग घ्यावा व ही चळवळ यशस्वी करावी असे आवाहनही त्यांनी केले.माजी खासदार दत्ता मेघे यांनी अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले. डॉ.सचिन पावडे यांनी वैद्यकीय जनजागृती मंचाने केलेल्या जलसंधारण कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकातून पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अशोक बगाडे यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाला फाउंडेशनचे अशोक सूर्यवंशी, दळवी, पं.स.चे विस्तार अधिकारी संजय वानखेडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार भाष्कर घैसास यांनी मानले.युवकांच्या शक्तीतुनच पाण्याची क्रांती शक्य -सोनाली कुळकर्णीराज्यात गत काही वर्षात दुष्काळ पडत आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राज्यात सुरू आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश घरोघरी पोहोचविणे गरजेचे आहे. आजच्या कार्यक्रमाला युवक व युवतींची उपस्थिती लक्षणीय आहे. युवकांच्या शक्तीतुनच नवीन पाण्याची क्रांती होऊ शकते, असे विचार सिनेतारका सोनाली कुळकर्णी यांनी केले.युवक युवतींनी पाण्याच्या संवर्धनासाठी पुढे यावे. त्यांनी आपली संपूर्ण उर्जा याकामी लावावी. यातून हा परिसर सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा जमिनीतील स्तर वाढविणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात उद्बोधन करण्याकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.