शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जलसंधारण अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:59 IST

अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

ठळक मुद्देसोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती : सेलू येथे कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतसेलू : अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाचे प्रमाणही देशात व राज्यात कमी होत आहे. अशा परिस्थितीत नियोजन होणे आवश्यक आहे. याच हेतुने सेलू येथे विद्याभारती महाविद्यालयाच्यावतीने जलसंधारण चळवळ उभी करण्यात आली आहे. सोमवारी सिनेतारका सोनाली कुळकर्णी यांच्या उपस्थितीत येथील विद्याभारती महाविद्यालयातून जलसंधारण अभियानास प्रारंभ करण्यात आला.जलसंधारण अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार दत्ता मेघे, विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर, आ.डॉ. पंकज भोयर, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे, प्राचार्य डॉ. संजय कानोडे, अ‍ॅड. शितल भोयर, डॉ. पावडे उपस्थित यांची उपस्थिती होती.आ.डॉ. भोयर म्हणाले की, या अभियानासाठी सेलू तालुक्याची निवड झाली ही भुषणावह बाब आहे. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. परंतु त्या तुलनेत पाणी जमिनीत जिरविण्यासंदर्भात कोणतेच कार्य आजपर्यंत झाले नाही. त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य नागरिकही भोगत आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे. या लोकाभिमुख चळवळीत युवक युवतींनी सहभाग घ्यावा व ही चळवळ यशस्वी करावी असे आवाहनही त्यांनी केले.माजी खासदार दत्ता मेघे यांनी अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले. डॉ.सचिन पावडे यांनी वैद्यकीय जनजागृती मंचाने केलेल्या जलसंधारण कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकातून पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अशोक बगाडे यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाला फाउंडेशनचे अशोक सूर्यवंशी, दळवी, पं.स.चे विस्तार अधिकारी संजय वानखेडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार भाष्कर घैसास यांनी मानले.युवकांच्या शक्तीतुनच पाण्याची क्रांती शक्य -सोनाली कुळकर्णीराज्यात गत काही वर्षात दुष्काळ पडत आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राज्यात सुरू आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश घरोघरी पोहोचविणे गरजेचे आहे. आजच्या कार्यक्रमाला युवक व युवतींची उपस्थिती लक्षणीय आहे. युवकांच्या शक्तीतुनच नवीन पाण्याची क्रांती होऊ शकते, असे विचार सिनेतारका सोनाली कुळकर्णी यांनी केले.युवक युवतींनी पाण्याच्या संवर्धनासाठी पुढे यावे. त्यांनी आपली संपूर्ण उर्जा याकामी लावावी. यातून हा परिसर सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा जमिनीतील स्तर वाढविणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात उद्बोधन करण्याकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.