शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘पेरते व्हा़़़धुळपेरणीला प्रारंभ’

By admin | Updated: June 15, 2014 23:41 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धुळपेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा : महागड्या बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीततळेगाव (टा़) : दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धुळपेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़ सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी ‘पेरते व्हा’चा संदेश देत धुळपेरणी आटोपती घेतल्याचे दिसते़परिसरात ओलिताची सोय असल्यानेही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणीवर अधिक भर देतात़ मागील वर्र्षी मृग नक्षत्रात पाऊस आल्याने कपाशी व सोयाबीनची पेरणी आटोपली होती; पण यंदा आठवडा लोटूनही पावसाचे संकेत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धुळपेरणीस प्रारंभ केला आहे़ गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने नाल्याच्या काठावर शेत असलेल्या शेतकऱ्यांचे पीक खरडून गेले़ सोयाबीनसह रब्बी पिकालाही फटका बसला. शेतकऱ्यांनी उन्हाची तमा न बाळगता लग्नकार्य आटोपून मान्सूनपूर्व मशागतीची कामे पूर्ण केलीत़ सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धुळपेरणीसाठी सरसावले असले तरी भारनियमनामुळे तेही अशक्य होत आहे. पाऊस आल्यास घाई होऊ नये म्हणूनही शेतकरी धुळपेरणी करीत आहे. काही शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असताना ते धुळपेरणी करण्यास धजावत नाही तर काही कोरड्यामध्ये लावण करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाण्यांचे भाव वाढले असून उगवण शक्तीबाबत साशंकता आहे़ यामुळे बहुतांश शेतकरी कपाशीची लागवड करीत असल्याचे दिसते़ मागील वर्र्षी सोयाबीनला अंकुर फुटल्याने ३० किलोची बॅग २ हजार ५०० रुपयांवर मिळत आहे़ असे असले तरी बियाणे गुणवत्तापूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना एक एकर शेतात ४० ते ४५ किलो बियाणे खर्ची घालावे लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप बँकेचे कर्ज न मिळाल्याने बियाणे खरेदी लांबली आहे़ मागील वर्षी उत्पन्ना घट झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. यामुळे अनेकांना कर्ज अदा करता आले नाही़ यंदा दागिने गहाण करून वा सावकाराकडून आणून कर्ज फेड करून नवीन कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे़ आजही अनेक शेतकरी कर्ज मंजुर होण्याच्या प्रतिक्षेत आहे.(वार्ताहर)