शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास आरोग्य विभागाची ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:35 IST

रक्तरंजित क्रांतीच्या शहीदभूमीला राज्य शासनाने मालवण पॅटर्न प्रमाणे ग्रामीण रुग्णालय दिले.

ठळक मुद्देआश्वासन ठरतेय फोल : रुग्णांना जावे लागते अमरावती अन् नागपूरला

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : रक्तरंजित क्रांतीच्या शहीदभूमीला राज्य शासनाने मालवण पॅटर्न प्रमाणे ग्रामीण रुग्णालय दिले. बांधकाम होऊनही अद्याप वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी, रुग्णांना नागपूर व अमरावती येथील रुग्णालयात जावे लागत आहे. दिलेले आश्वासन फोल ठरत असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.शासकीय यंत्रणा मनुष्यच चालवितो. तरीसुध्दा त्यांच्या हृदयाला पाझर फुटू नये ही शोकांतीकाच आहे, अशी चर्चा सध्या परिसरात आहे. सुमारे तीन कोटी खर्चुन ग्रामीण रुग्णालय पूर्ण झाले. परंतु, येथे वैद्यकीय, परिचारीका, फर्निचर, तपासणीचे विविध यंत्र अद्यापही आले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कामकाज चालविले जात आहे. त्यामुळे तेथील डॉक्टरांवर सध्या कामाचा अधिकचा बोझा पडत आहे. पण, ते तोंड बंद करूनच बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असून दिवसागणिक येथे कुठलीना कुठली अनुचित घटना घडत असते. शिवाय वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजुर जखमी झाल्याचे अनेक उदारहणे आहेत. अशावेळी चांगली आरोग्य सेवा घेण्यासाठी नागरिकांना नागपूर किंवा अमरावती येथील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. गत वर्षी योग्य वेळी चांगली आरोग्य सेवा न मिळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत आष्टी परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची नागरिकांची मागणी आहे.अनेकांचे लक्ष वेधले; पण कार्यवाही शून्यचयेथे ग्रामीण रुग्णालय नसल्याने नागरिकांना व रुग्णांना अमरावती व नागपूर येथे जावून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे म्हणून काही लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केलेत. शिवाय काही सुजान नागरिकांनी नागपूरच्या आरोग्य उपसंचालक, मुंबईच्या आरोग्य संचालक शिवाय आरोग्यमंत्री यांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात येते. इतके होऊनही सुदृढ व निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगणाºयांना अद्याप जाग आली नसल्याची परिसरात ओरड आहे.