शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

खादी बोर्डामार्फत हजार अंबरचरखे सुरू करा

By admin | Updated: October 4, 2015 02:58 IST

तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला.

आश्रम प्रतिष्ठानची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन सादरसेवाग्राम : तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला. जमिनीचा मोबदलाही ठरला. परंतु आराखड्याच्या कामापूर्वी जेष्ठ गांधीवादी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांची बैठक मुंबईला ठरवावी. तसेच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून रोजगारासाठी लोक शहराकडे जात आहे. विदर्भ कापूस उत्पादनाचा प्रांत असल्याने शासनाने एक हजार अंबर चरखे खादी ग्रामोद्योग बोर्डामार्फत सुरू करावेत, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली.गांधीजींच्या १४६ व्या जयंती पर्वावर राज्याचे अर्थ व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे महात्मा गांधी आश्रमला भेट देण्यासाठी आले असता सदर मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. निवेदनातून सेवाग्राम विकास आराखडा, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ, बलुतेदारांचा प्रश्न आणि वर्धा जिल्हा दारूमुक्तीवर करावयाच्या उपाययोजना यावर प्रकर्षाने भर टाकून वास्तव पालकमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. वर्ध्यामध्ये ग्रामसेवा मंडळामध्ये स्लायव्हर प्लॅट सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी अंबर चरखे, कापसाचे गोदाम, आदी व्यवस्था करून देण्यात याव्या. महाराष्ट्रातील खादी संस्था यावर कार्य करू शकतील, यासाठी ंसदर मागणी करण्यात आली. हजारो बलुतेदारांना वाऱ्यावर सोडून रोजी रोटीपासून वंचित करण्यात आले आहे. खादी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी आपणाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. बोर्डाची वाटचाल खाजगीकरणाकडे असल्याचे कर्मचाऱ्यांनी आश्रमला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले. त्यामुळे बलुतेदारांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूचे पाट वाहतात. त्यामुळे जिल्हा दारुमुक्त होण्यासाठी पिण्याचे परवाने टप्प्या-टप्प्याने रद्द करण्याचा विचार करावा, अशी मागणीही प्रतिष्ठाच्या वतीने जयवंत मठकर यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना केली. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे इतरही सहकारी उपस्थित होते.(वार्ताहर) स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीसेवाग्राम : येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच वनविभागाच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाने अंत्यविधी शेड बांधून नियमांचे उल्लघंन केले आहे. याची शासनाने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आश्रमपुढील मार्गावर गांधी जयंतीदिनी करण्यात आले होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सेवाग्राम आश्रमात गांधीजयंतीनिमित्त आले असता त्यांना पांडुरंग गोसावी, ज्ञानेश्वर कुमरे यांनी निवेदन सादर करून ही मागणी केली. निवेदनानुसार ग्रामपंचायतीने २०१३ रोजी वनविभागाच्या आणि अत्यंविधीसाठी नसलेल्या जागेवर शेड बनविले. त्यामुळे शेत लागून असलेल्या शेतकऱ्यांने कोर्टात तक्रार दाखल केली. न्यायालयाने अंत्यविधी मनाईचा आदेश दिला. तरीसुद्धा शेडमध्ये अत्यंविधी करण्यात यावा यासाठी काही लोकांचा प्रयत्न असल्याचे निवेफनात नमूद आहे. शासनाने १९६२ मध्ये ग्रा.पं. ला सर्वधर्मीय मोक्षधामासाठी सहा एकर जमीन दिली. पण यावर अतिक्रमण करून शेती करण्यात येत असल्याचेही निवेदनातून म्हटले आहे. त्यामुळे या समस्येकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.