शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

खादी बोर्डामार्फत हजार अंबरचरखे सुरू करा

By admin | Updated: October 4, 2015 02:58 IST

तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला.

आश्रम प्रतिष्ठानची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन सादरसेवाग्राम : तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला. जमिनीचा मोबदलाही ठरला. परंतु आराखड्याच्या कामापूर्वी जेष्ठ गांधीवादी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांची बैठक मुंबईला ठरवावी. तसेच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून रोजगारासाठी लोक शहराकडे जात आहे. विदर्भ कापूस उत्पादनाचा प्रांत असल्याने शासनाने एक हजार अंबर चरखे खादी ग्रामोद्योग बोर्डामार्फत सुरू करावेत, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली.गांधीजींच्या १४६ व्या जयंती पर्वावर राज्याचे अर्थ व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे महात्मा गांधी आश्रमला भेट देण्यासाठी आले असता सदर मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. निवेदनातून सेवाग्राम विकास आराखडा, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ, बलुतेदारांचा प्रश्न आणि वर्धा जिल्हा दारूमुक्तीवर करावयाच्या उपाययोजना यावर प्रकर्षाने भर टाकून वास्तव पालकमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. वर्ध्यामध्ये ग्रामसेवा मंडळामध्ये स्लायव्हर प्लॅट सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी अंबर चरखे, कापसाचे गोदाम, आदी व्यवस्था करून देण्यात याव्या. महाराष्ट्रातील खादी संस्था यावर कार्य करू शकतील, यासाठी ंसदर मागणी करण्यात आली. हजारो बलुतेदारांना वाऱ्यावर सोडून रोजी रोटीपासून वंचित करण्यात आले आहे. खादी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी आपणाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. बोर्डाची वाटचाल खाजगीकरणाकडे असल्याचे कर्मचाऱ्यांनी आश्रमला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले. त्यामुळे बलुतेदारांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूचे पाट वाहतात. त्यामुळे जिल्हा दारुमुक्त होण्यासाठी पिण्याचे परवाने टप्प्या-टप्प्याने रद्द करण्याचा विचार करावा, अशी मागणीही प्रतिष्ठाच्या वतीने जयवंत मठकर यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना केली. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे इतरही सहकारी उपस्थित होते.(वार्ताहर) स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीसेवाग्राम : येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यात यावे तसेच वनविभागाच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाने अंत्यविधी शेड बांधून नियमांचे उल्लघंन केले आहे. याची शासनाने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आश्रमपुढील मार्गावर गांधी जयंतीदिनी करण्यात आले होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सेवाग्राम आश्रमात गांधीजयंतीनिमित्त आले असता त्यांना पांडुरंग गोसावी, ज्ञानेश्वर कुमरे यांनी निवेदन सादर करून ही मागणी केली. निवेदनानुसार ग्रामपंचायतीने २०१३ रोजी वनविभागाच्या आणि अत्यंविधीसाठी नसलेल्या जागेवर शेड बनविले. त्यामुळे शेत लागून असलेल्या शेतकऱ्यांने कोर्टात तक्रार दाखल केली. न्यायालयाने अंत्यविधी मनाईचा आदेश दिला. तरीसुद्धा शेडमध्ये अत्यंविधी करण्यात यावा यासाठी काही लोकांचा प्रयत्न असल्याचे निवेफनात नमूद आहे. शासनाने १९६२ मध्ये ग्रा.पं. ला सर्वधर्मीय मोक्षधामासाठी सहा एकर जमीन दिली. पण यावर अतिक्रमण करून शेती करण्यात येत असल्याचेही निवेदनातून म्हटले आहे. त्यामुळे या समस्येकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.