शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

कापूस, चण्याची शासकीय खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

मागील वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे यावर्षी तालुक्यात कापसाचा पेरा वाढला. चार हजारांवर हेक्टरमध्ये कापूस, तूर व चणा लागवड करण्यात आली. शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला जात असून यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआय आणि नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून केवळ कारंजा तालुक्यात केंद्र सुरू करण्यात आले नाही.

ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कापूस आणि तूर, चन्याला हमीभाव मिळावा व सध्या होत असलेली आर्थिक लूट थांबवावी यासाठी शासनामार्फत सीसीआयकडून कापसाची तर नाफेडकडून चणा व तूर खरेदी, सुरू करावी, अशी मागणी कारंजा तालुका भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने केली आहे.मागील वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे यावर्षी तालुक्यात कापसाचा पेरा वाढला. चार हजारांवर हेक्टरमध्ये कापूस, तूर व चणा लागवड करण्यात आली. शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला जात असून यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआय आणि नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून केवळ कारंजा तालुक्यात केंद्र सुरू करण्यात आले नाही.तळेगावला सीसीआयतर्फे कापसाची शासकीय खरेदी सुरू झाली आहे. मात्र, तळेगावचे केंद्र ५० कि.मी. अंतरावर आहे. तालुक्यातील शेतकºयांना विक्रीस नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. चणा व तूर खरेदीसाठी नाफेडचे केंद्र कारंजा व आष्टीसाठी शासनाने मंजूर केले आहे. जवळपास ६०० शेतकऱ्यांनी तूर व चणा विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, वर्धा जिल्हा शासकीय भांडाराच्या हेकेखोर धोरणामुळे अद्याप सुरू झाले नाही. आष्टी व कारंजा ही दोन्ही शासकीय खरेदी केंद्रे वर्धा शहरापासून ६० कि.मी. पेक्षा अधिक आहे, म्हणून खरेदी सुरू करण्यात आली नाही, असा तुघलकी युक्तिवाद करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी कापसाची सीसीआयमार्फत व चणा आणि तुरीची नाफेडमार्फत शासकीय खरेदी सुरू करीत शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कारंजा तालुका भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे विनोद वलगावकर, राजू पालीवाल, राजू जोरे, प्रशांत घोडमाडे यांनी केली आहे.कोरोनाचा फटका कापसाचे भाव कोसळलेखुल्या बाजारात प्रतिक्विंटल १ हजार ते १२०० रुपयांनी कमीतळेगाव (श्या.पंत.) : एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली कापुस खरेदी सर्व आदेशाचे पालन करीत सीसीआयने निवड केलेल्या जिनिंग फॅक्टरीतील खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे कापसाचे दर कोसळले आहे. सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर शासनाच्या हमीदरापेक्षा प्रतिक्विंटल १ हजार ते १२०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकºयांना जबर आर्थिक फटका बसला आहे. लागवड खर्चही निघणे अवघड असल्याने वार्षिक आर्थिक नियोजन बिघडलेसीसीआयकडून कापसाला खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव दिला जात असल्याने शेतकºयांची पावले सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे वळली आहेत. सीसीआयकडून खासगी व्यापाºयांपेक्षा जास्त दरात कापूस खरेदी केली जात असली तरी केंद्रावर शेतकºयांची गर्दी होऊ नये याकरीता प्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केल्यानंतर ज्या दिवशी ज्यांचा नंबर लागेल, त्याच दिवशी कापूस गाडी भरावी लागत असल्याने, आणि मोजक्याच गाड्या घेतल्या जात असल्याने खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या अडचणी वाढत आहेत. अनेक शेतकरी नाईलाजाने खासगी व्यापाºयांना ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये इतक्या कमी भावात कापूस देत आहे.

टॅग्स :cottonकापूस