शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:16 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : ना हमी, ना भाव, निव्वळ थापाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे. सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर तातडीने खरेदी करण्याची मागणी आ. रणजित कांबळे यांनी केली आहे. सोबत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल होत असून सध्या सरकारची शेतकऱ्यांना न हमी, न भाव, निव्वळ थापा मिळत असल्याची टीका त्यांनी केली आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दीडपट भाव देण्याची घोषणा केली. ही घोषणा सरकार सारखीच फसवी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावात कोणतीही अट न ठेवता पूर्ण तुरीची खरेदी करावी. जिल्ह्यात १ फेब्रुवारी रोजी १० शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. तूर खरेदीचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. पण पुन्हा ग्रेडर नसल्याचे कारण देत जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत सुरू असलेले सातखरेदी केंद्र अद्यापही बंद आहे. शासकीय आकडेवारी नुसार मुहूर्तावर वेळी केवळ ५३.८४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. विदर्भ मार्केटींगचे तीन खरेदी केंद्र सोमवार पासून सुरू करण्यात आले. यात केवळ ३,४५,०२० क्विंटल तूर खेरदी केली आहे. जिल्ह्यात २७०२ शेतकऱ्यांचे आॅनलाईन नोंदणी झाली आहे. पण त्या प्रमाणात खरेदी शून्य असल्याच चित्र आहे. गत वर्षी सुद्धा नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांना आपली तूर व्यापाऱ्यांना विकावी लागली. ग्रेडर नसणे, बारदाने नसणे तर कधी स्टोरेज समस्या या सर्व गोष्टीची प्रशासनाला अनुभव आहे. याच गोष्टी या वर्षी पुन्हा घडताना दिसत आहे.सरकारची कर्जमाफीची घोषणा, बोंडअळीचे नुकसान भरपाई या गोष्टीची पूर्तता सरकारने केली नसून शेतकऱ्यांना सरकार फसवत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी तातडीने करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सरकारने काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या तुरीची पूर्ण खरेदी करत एकही दाणा शिल्लक राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. अन्यथा सरकारला जड जाईल, असेही आ. रणजित कांबळे यांनी पत्रकातून कळविले आहे.