शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:16 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : ना हमी, ना भाव, निव्वळ थापाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे. सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर तातडीने खरेदी करण्याची मागणी आ. रणजित कांबळे यांनी केली आहे. सोबत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल होत असून सध्या सरकारची शेतकऱ्यांना न हमी, न भाव, निव्वळ थापा मिळत असल्याची टीका त्यांनी केली आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दीडपट भाव देण्याची घोषणा केली. ही घोषणा सरकार सारखीच फसवी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावात कोणतीही अट न ठेवता पूर्ण तुरीची खरेदी करावी. जिल्ह्यात १ फेब्रुवारी रोजी १० शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. तूर खरेदीचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. पण पुन्हा ग्रेडर नसल्याचे कारण देत जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत सुरू असलेले सातखरेदी केंद्र अद्यापही बंद आहे. शासकीय आकडेवारी नुसार मुहूर्तावर वेळी केवळ ५३.८४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. विदर्भ मार्केटींगचे तीन खरेदी केंद्र सोमवार पासून सुरू करण्यात आले. यात केवळ ३,४५,०२० क्विंटल तूर खेरदी केली आहे. जिल्ह्यात २७०२ शेतकऱ्यांचे आॅनलाईन नोंदणी झाली आहे. पण त्या प्रमाणात खरेदी शून्य असल्याच चित्र आहे. गत वर्षी सुद्धा नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांना आपली तूर व्यापाऱ्यांना विकावी लागली. ग्रेडर नसणे, बारदाने नसणे तर कधी स्टोरेज समस्या या सर्व गोष्टीची प्रशासनाला अनुभव आहे. याच गोष्टी या वर्षी पुन्हा घडताना दिसत आहे.सरकारची कर्जमाफीची घोषणा, बोंडअळीचे नुकसान भरपाई या गोष्टीची पूर्तता सरकारने केली नसून शेतकऱ्यांना सरकार फसवत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी तातडीने करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सरकारने काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या तुरीची पूर्ण खरेदी करत एकही दाणा शिल्लक राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. अन्यथा सरकारला जड जाईल, असेही आ. रणजित कांबळे यांनी पत्रकातून कळविले आहे.