शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

व्यावसायिकसह अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षा साधारण जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतात. तर विद्यापीठाचे निकाल जलै ते ऑगस्ट मध्ये लागतात. त्यानंतर लगेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी अव्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बोर्डाचे तसेच विद्यापीठाचे निकाल लागल्यानंतर लगेच व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाने व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबतच सुरू करावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली असल्याची माहिती जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षा साधारण जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतात. तर विद्यापीठाचे निकाल जलै ते ऑगस्ट मध्ये लागतात. त्यानंतर लगेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी अव्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे मुख्य कारण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा ही खूप उशिरा होतात. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्त राहतात. राज्यात इंजिनिअरींग च्या १,५५,००० जागा आहेत. त्यापैकी ६०,००० रिक्त आहेत. फार्मसीच्या ३४०० जागा आहेत त्यापैकी १५०० जागा रिक्त आहेत. एम. बी. ए.च्या ४३०० जागा आहेत. त्यापैकी १७०० जागा रिक्त आहेत. विधी अभ्यासक्रमाच्या ३०,००० जागा आहेत त्यापैकी ७००० जागा रिक्त आहेत. एमसीएच्या ८०० जागा आहेत. ज्यापैकी ३०० जागा रिक्त आहेत. बी. एड. च्या ३७,००० जागा आहेत त्यापैकी १४००० जागा रिक्त आहेत. पॉलिटेक्निकच्या १,४२,००० जागा आहेत. त्यापैकी ८०,००० जागा रिक्त आहेत. एकूणच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहतात. नागपूर विद्यापीठाने अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होतील. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षाची वाट पहावी लागणार आहे. ज्या की खुप उशिरा होणार आहेत. हा एक प्रकारचा दुजाभाव व शैक्षणिक विषमता असून शासनाने हा शैक्षणिक खोळंबा रोखण्याकरिता व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सोबतच सुरू करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाबाबतीत अडचणी येणार नाहीत, अशी मागणी आपण निवेदनातून केल्याचे यावेळी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.

 

टॅग्स :Educationशिक्षण