शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

खादी विचार, मूल्य व जनमनावर उभी राहावी

By admin | Updated: September 18, 2016 00:51 IST

गांधी विचार व कार्यावर माझी निष्ठा व आस्था आहे. खादीच्या कामांना कसे पुढे नेता येईल. याचा विचार करण्याची वेळ, प्रसंग आता आलेला आहे.

रामचंद्र राही : शांती निकेतन येथील खादी सभेचा दुसरा दिवस, देशातील प्रतिनिधींची उपस्थितीसेवाग्राम : गांधी विचार व कार्यावर माझी निष्ठा व आस्था आहे. खादीच्या कामांना कसे पुढे नेता येईल. याचा विचार करण्याची वेळ, प्रसंग आता आलेला आहे. पुंजीवादी केंद्रीत व्यवस्था निर्माण झाल्याने मुठभर लोकांच्या हातात देशाचा निर्णय केंद्रीत झालेला आहे. वास्तविक पुंजीद्वारे श्रमाचा योग्य विनियोग व उपयोग व्हायला पाहिजे; पण तसे होताना दिसत नसल्याने खादी क्षेत्राची अवस्था बिकट होत आहे. खादी विचार, मूल्य जनमनावर उभी राहिल्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही, असे विचार गांधी स्मारक निधी दिल्लीचे मंत्री रामचंद्र राही यांनी व्यक्त केले.नई तालीम समितीच्या शांती भवनमध्ये खादी सभा सुरू असून शनिवारी दुसऱ्या दिवशी खादी संस्थांचे प्रतिनिधी संस्थाच्या समस्या व सरकारची निती यावर विचार विचार व्यक्त करीत आहे.रामचंद्र राही पुढे म्हणाले, भारत सरकारपुढे खादी एक आयटम आहे. कॉटनची क्रेज वाढल्यास अधिक नफा मिळेल. म्हणून खादीचे दर्शन आजच्या अर्थव्यवस्थेच्या विरूद्ध उभी असल्याचे दिसते. सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले, स्वच्छता अभियानात गांधी विचारांचा समावेश गरजेचा आहे. गांधीजींनी सफाई शस्त्र बनविले. शौचालयाचे विभिन्न प्रकार त्यांनी तयार करून खताचा यशस्वी व उपयोगी प्रयोग आपल्या समोर आहे. देशात पुंजीवाद वाढत आहे. बँकेचे कर्ज माफ करून बँकेचे दिवाळे व खाजगीकरणाचा डाव सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी उत्तर प्रदेशचे विश्वेश्वरनाथ तिवारी, ब्रह्मनाद शुक्ला इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन इंदोरचे पुष्पेंद्र दुबे यांनी केले.(वार्ताहर) सर्व इतिहासजमा झाल्याने खादी युगाला नव्या प्रारंभाची गरजखादी सोबत अनेक रचनात्मक कार्य जुळलेले आहे. यावर कार्य करणाऱ्यांची एक जमात होती. आता सर्व इतिहास जमा झाल्याने खादी युगाला नव्याने सुरूवात करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थांसमोर नव्या समस्या व अडचणी निर्माण करण्याचे काम देशस्तरावर होत आहे. खादी रोजगार देण्याचे नाही तर ग्राम स्वराज्य सिद्ध करते. गावातच बनून गावातील लोक त्याचा उपयोग करेल. तिच आदर्श ग्राम योजना सरकारची योजना नफ्याची असल्याने बाजारीकरणावर अधिक भर आहे. यातून ग्रामीण कारागिरांचे शोषण होत आहे. खादी क्षेत्र मागे पडत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. सभेला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, बिहार, हरियाना, गुजरात तामीळनाडू, कर्नाटक, आसाम, पंजाब, हिमाचल प्रदेश आदि राज्यातील प्रतिनिधी उपस्थित आहे.