शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

रेल्वे स्थानकावर अस्वच्छ पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: September 17, 2015 02:41 IST

स्थानिक रेल्वे स्थानकावर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करणारी विहीर अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आली नहाी.

प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात : शुद्धीकरण प्रक्रियेविनाच पुरविले जाते पाणीहेमंत चंदनखेडे  हिंगणघाटस्थानिक रेल्वे स्थानकावर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करणारी विहीर अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आली नहाी. शिवाय परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. या दूषित पाण्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देत रेल्वे स्थानकावर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.मध्ये रेल्वे अंतर्गत येणारे स्थानिक रेल्वेस्थानक दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील वर्र्ध्यानंतर प्रथम प्रमुख रेल्वेस्थानक आहे. येथील रेल्वे स्थानकावर दोन फलाट असून अप-डाऊन गाड्यांचा प्रवास सुरू असतो. एक्सप्रेस गाड्यांना थांबा असल्याने प्रवासी पिण्याचे पाणी घेण्याकरिता स्थानकावर उतरतात; पण हे पाणी अशुद्ध आणि अस्वच्छ आहे काय, हे कळण्यास त्यांना मार्ग नसतो. ही बाब कित्येकांच्या ध्यानीमनीही येत नाही. अजाणतेपणामुळे अशुद्ध पाण्याचाच वापर होतो. १९५४ मध्ये हिंगणघाट रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने पोद्दार बगीचाजवळील एका विहिरीतून पाईपलाईन टाकण्यात आली. स्वत:च्या मालकीची जागा आणि विहीर ही रेल्वे स्थानकापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर आहे. या विहिरीला कुंपण भिंत असली तरी फाटक नसल्याने परिसर मोकळाच आहे. या विहिरीतून पाईपलाईने रेल्वे स्थानकावरील टाकीमध्ये पाणी घेतले जाते. तेथून पाणी स्थानकावर लावलेल्या नळांद्वारे प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले जाते. एका फलाटावर पिण्याच्या पाण्याचे नऊ स्टँड लावण्यात आले असून यात प्रत्येकी दोन नळांचा संच आहे. दोन फलाटावर एकूण १८ नळांचे स्टँड आहे. १६ स्टँड हे साध्या पाण्याचे तर दोन स्टँडवर थंड शुद्धीकरणासह पाण्याची सुविधा असलेले नळ संच आहेत. यातील १६ स्टँडद्वारे प्रवाश्यांना पुरविण्यात येत असलेले पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न करताच मिळते. गत कित्येक वर्र्षांपासून सदर विहीर स्वच्छ करण्यात आली नाही. यामुळे परिसरात दुर्र्गंधी पसरली असून विहिरीतील पाणी दूषित होत आहे. विहिरीच्या परिसरात कचरा वाढला असून रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे विहिरीतील पाणी अस्वच्छ व दूषित झाले आहे. या विहिरीची अवस्था वाईट असून अस्वच्छतेने कहर केला आहे. पाईपलाईनही जुनाट झाल्याने जागोजागी सडली आहे. या पाईपाईनमध्ये गटारातील पाणी मिळसले जात असल्याचेही दिसून येते. हेच अस्वच्छ व दूषित पाणी रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना उपलब्ध होत आहे. या प्रकारामुळे प्रवाश्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी प्रवाश्यांना उपलब्ध करून देण्याची रेल्वेची योजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेत त्वरित कारवाई करून योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.