शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानी करणार ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:28 IST

वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराम नेवले यांची माहिती : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा वीज मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील संविधान चौक ते कोराडीस्थित ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानापर्यंत मार्च काढून ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.विदर्भात ४१०० मेगावॅट वीज शिल्लक असताना सुद्धा विदर्भात सरकार पुन्हा १३२ नवीन कोळसा आधारित आणून ८६४०७ मेगावॅट वीज तयार करुन दिल्ली-मुंबईच्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरकरिता पाठविणार आहे. यासाठी अधिकचे वीज उत्पादन होणार असल्याने विदर्भाचा विनाश होईल.देशातील सर्वांत जास्त उष्ण १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्हे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली विदर्भातील आहे. नैसर्गिकरीत्या उष्ण होत असले तरी वीज प्रकल्पामुळे आणखीच उष्ण होत आहे. असे असतांना लोकप्रतिनिधींना याचे काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रावरील कर्ज वाढत आहे. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, असे अनेक प्रश्न असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य हाच पर्याय आहे. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.विदर्भातील सर्व जनतेचे झोपडपट्टी, शेतकरी पासून तर व्यापारी, उद्योजक, कारखानदारी या सर्वांचे दर निम्मे करावे, नवीन वीज प्रकल्प रद्द करून प्रदूषण टप्प्याटप्प्याने कमी करून प्रदूषणमुक्त विदर्भ करावा, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करून २४ तास वीज द्यावी, शेतकºयांना कृषिपंपाच्या वीज देयकातून मुक्त करावे या मागण्यांकरिता संविधान चौक ते कोराडीपर्यंत वीज मार्च काढणार असल्याचेही राम नवले यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, शैला देशपांडे, ज्योती निकम, माधुरी पाझारे, मधुसूदन हरणे, गजानन निकम, रूपेश शिदोडकर, हेमराज इखार, उल्हास कारोटकर, दत्ता राऊत, सतीश दाणी, गणेश मुटे, सारंग हरणे, किसना शेंडे, शांताराम भालेराव, तुकाराम थुटे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ