शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

एस.टी.ने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्पन्न केवळ एक ते दोन हजार रुपये होते. वर्धा विभागांतर्गत  वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) अशी एकूण पाच आगारे असून, एकूण २२८ बसेस आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट अद्याप कायम : नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर तब्बल दीड महिन्यानंतर एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.  मार्च महिन्यापासून यंदाही कोरोनाने थैमान घातल्याने अनलॉकनंतर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. अद्याप कोरोनाची भीती कायम असल्याने प्रवास करताय तर सॅनिटायझर घेतलाय ना? असा प्रश्न चालक-वाहकांकडून प्रवाशांना विचारला जात आहे.यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्पन्न केवळ एक ते दोन हजार रुपये होते. वर्धा विभागांतर्गत  वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) अशी एकूण पाच आगारे असून, एकूण २२८ बसेस आहेत. आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सरासरी २५ बसेस धावत आहेत.  सध्या २५ वाहक आणि २५ चालक सेवा देत आहेत. सर्वाधिक प्रवासी वाहतूक पुलगाव-वर्धा, हिंगणघाट-वर्धा, वर्धा-नागपूर या मार्गांवर असून, प्रत्येक फेरीवेळी संबंधित आगाराकडून बसगाड्या सॅनिटाईज केल्या जात आहेत. एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. वेळोवेळी बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

ना मास्क, ना सॅनिटायझरकोरोनाचे संकट तीव्र झाले असताना  अनेक प्रवासी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांना एस.टी.तून प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. परिणामी, बहुतांश वेळी प्रवासी आणि चालक-वाहकांत वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

उत्पन्नाला लाखो रुपयांचा फटकामार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने  केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस धावत होत्या. त्यामुळे महामंडळाच्या वाहतूक उत्पन्नाला मोठा आर्थिक फटका बसला. डिझेलचा खर्च करणेही महामंडळाला या काळात न परवडणारे झाले होते.

प्रवासी घरातचमार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाच्या संसर्गाने कहर केला. कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेख चढताच राहिला. त्यामुळे नागरिकांत अद्याप कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण प्रवास टाळत असून घरातच राहणे पसंत करीत आहेत.

एस.टी.ची सर्वाधिक वाहतूक नागपूर मार्गावरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात एस.टी.  अत्यावश्यक सेवेसाठी धावत होती. दीड महिन्यानंतर एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत आहे. रोज जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) आदी पाचही आगारे मिळून सरासरी २५ बसेस धावत आहेत.जिल्ह्यात प्रवाशांचा एस.टी.ला अल्प प्रतिसाद असला तरी वर्धा-नागपूर, हिंगणघाट-वर्धा आणि पुलगाव-वर्धा या मार्गांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक होत आहे.

बस सुरू झाली अन् जिवात जीव आलाकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मध्यंतरीच्या काळात एस.टी. बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत होत्या. त्यामुळे वाहतूक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही  वेतनावरही टांगती तलवार होती. अनलॉकमुळे आता एस.टी. बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने वेतनाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. -श्रीकांत भांडेकर, चालक, वर्धा. 

मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून तो यावेळीही कायम आहे. बसफेऱ्याच सुरू नसल्याने एस.टी.ला मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षी वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली. कोरोनामुळे ती याहीवेळी होते की काय, अशी भीती होती. मात्र, आता एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत असल्याने जिवात जीव आला आहे.- अमित लोखंडे, वाहक, वर्धा.

 

टॅग्स :state transportएसटी