शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

एस.टी.ने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्पन्न केवळ एक ते दोन हजार रुपये होते. वर्धा विभागांतर्गत  वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) अशी एकूण पाच आगारे असून, एकूण २२८ बसेस आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट अद्याप कायम : नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर तब्बल दीड महिन्यानंतर एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.  मार्च महिन्यापासून यंदाही कोरोनाने थैमान घातल्याने अनलॉकनंतर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. अद्याप कोरोनाची भीती कायम असल्याने प्रवास करताय तर सॅनिटायझर घेतलाय ना? असा प्रश्न चालक-वाहकांकडून प्रवाशांना विचारला जात आहे.यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्पन्न केवळ एक ते दोन हजार रुपये होते. वर्धा विभागांतर्गत  वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) अशी एकूण पाच आगारे असून, एकूण २२८ बसेस आहेत. आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सरासरी २५ बसेस धावत आहेत.  सध्या २५ वाहक आणि २५ चालक सेवा देत आहेत. सर्वाधिक प्रवासी वाहतूक पुलगाव-वर्धा, हिंगणघाट-वर्धा, वर्धा-नागपूर या मार्गांवर असून, प्रत्येक फेरीवेळी संबंधित आगाराकडून बसगाड्या सॅनिटाईज केल्या जात आहेत. एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. वेळोवेळी बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

ना मास्क, ना सॅनिटायझरकोरोनाचे संकट तीव्र झाले असताना  अनेक प्रवासी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांना एस.टी.तून प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. परिणामी, बहुतांश वेळी प्रवासी आणि चालक-वाहकांत वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

उत्पन्नाला लाखो रुपयांचा फटकामार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने  केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस धावत होत्या. त्यामुळे महामंडळाच्या वाहतूक उत्पन्नाला मोठा आर्थिक फटका बसला. डिझेलचा खर्च करणेही महामंडळाला या काळात न परवडणारे झाले होते.

प्रवासी घरातचमार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाच्या संसर्गाने कहर केला. कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेख चढताच राहिला. त्यामुळे नागरिकांत अद्याप कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण प्रवास टाळत असून घरातच राहणे पसंत करीत आहेत.

एस.टी.ची सर्वाधिक वाहतूक नागपूर मार्गावरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात एस.टी.  अत्यावश्यक सेवेसाठी धावत होती. दीड महिन्यानंतर एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत आहे. रोज जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) आदी पाचही आगारे मिळून सरासरी २५ बसेस धावत आहेत.जिल्ह्यात प्रवाशांचा एस.टी.ला अल्प प्रतिसाद असला तरी वर्धा-नागपूर, हिंगणघाट-वर्धा आणि पुलगाव-वर्धा या मार्गांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक होत आहे.

बस सुरू झाली अन् जिवात जीव आलाकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मध्यंतरीच्या काळात एस.टी. बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत होत्या. त्यामुळे वाहतूक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही  वेतनावरही टांगती तलवार होती. अनलॉकमुळे आता एस.टी. बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने वेतनाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. -श्रीकांत भांडेकर, चालक, वर्धा. 

मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून तो यावेळीही कायम आहे. बसफेऱ्याच सुरू नसल्याने एस.टी.ला मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षी वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली. कोरोनामुळे ती याहीवेळी होते की काय, अशी भीती होती. मात्र, आता एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत असल्याने जिवात जीव आला आहे.- अमित लोखंडे, वाहक, वर्धा.

 

टॅग्स :state transportएसटी