शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कॅशलेस व्यवहाराकडे एसटी महामंडळाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीच्या स्मार्ट कार्ड पाठोपाठ एसटी महामंडळाने ओव्हर द काउंटर (ओटीसी) कार्ड सुरू केले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नमूद नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल. हे कार्ड  बसमधील वाहकाच्या मशीनवर लावल्यानंतर प्रवासासाठीचे पैसे कार्डमधून जातील. या कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची यापुढे गरज भासणार नाही. 

ठळक मुद्देप्रवासाकरिता ‘ओटीसी’ कार्ड : ओळखपत्राची नाही गरज

लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा : एसटीकडून बसमध्ये पैशांची देवाण-घेवाण कॅशलेस होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. सध्या विविध  सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. हे स्मार्ट कार्ड  संबंधित प्रवाशानच्या आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असणार आहे. मात्र, आता कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज नसलेल्या ओळखपत्राची गरज नसलेले ओटीसी कार्ड (ओव्हर द कार्ड) तयार करण्यात आले आहे. या कार्डचा कुणालाही वापर करता येणार आहे. विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीच्या स्मार्ट कार्ड पाठोपाठ एसटी महामंडळाने ओव्हर द काउंटर (ओटीसी) कार्ड सुरू केले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नमूद नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल. हे कार्ड  बसमधील वाहकाच्या मशीनवर लावल्यानंतर प्रवासासाठीचे पैसे कार्डमधून जातील. या कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची यापुढे गरज भासणार नाही. ओटीसी कार्ड स्मार्ट कार्डसारखेच असले तरी त्यावर छायाचित्र किंवा प्रवाशाचे नावही नसेल. एसटीने करार केलेल्या एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड मिळणार आहे. कुठल्याही एसटी बसस्थानकांवर हे कार्ड मात्र मिळणार नसल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले  आहे. संबंधित एजंटला प्रवाशाचे नाव व मोबाईल क्रमांक सांगितल्यानंतर लगेच हे कार्ड मिळू शकेल. त्यावर केवळ कार्डचा क्रमांक व अन्य माहिती नमूद असणार आहे. या एजंटकडूनच प्रवाशांना आपल्या प्रवास  खर्चानुसार रिचार्ज करून मिळेल. त्यांना पैसे दिल्यानंतर कार्ड रिचार्ज होणार आहे.असे आहे ओटीसी कार्डरिचार्ज केलेले कार्ड एसटी बसमध्ये वाहकाकडे द्यावे लागणार आहे. वाहक आपल्याकडील इटीआयएम मशीनवर हे कार्ड लावेल. कार्डची माहिती मशीनवर आल्यानंतर  प्रवाशांना उतरण्याचा थांबा सांगावा लागणार आहे. त्यानुसार वाहक मशीनमधील थांब्याची निवड करेल. कार्डमध्ये पुरेसे पैसे असल्यास वाहकाकडून पुढील प्रक्रिया करून प्रवाशांना तिकीट दिले जाईल. कार्डमध्ये पैसे नसल्यास प्रवाशांना रोख रक्कम द्यावी लागेल. ही प्रक्रिया करताना प्रवाशाला कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही. यात वाहकावरील ताण कमी होणार असून वादाचे प्रसंग उद्‌भवणार नाहीत.

परिवहन महामंडळ होतेय ‘स्मार्ट’ बदलत्या तंत्रज्ञान राज्य परिवहन महामंडळानेही स्वीकारले आहे. लवकरच राज्यातील सर्वच बसगाड्यांना (व्हीटीएस) व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात येणार असून घरबसल्यास एसटीचे लोकेशन कळणार आहे. आता कॅशलेस व्यवहारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत एसटीने ओटीसी कार्ड आणले आहे. त्यामुळे परिवहन महामंडळ स्मार्ट होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

 

टॅग्स :state transportएसटी