शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२३६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी सुसाट, प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 18:19 IST

रापम कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी जिल्ह्यातील सर्वच आगारांत नवीन कंत्राटी चालकांच्या मदतीने सर्वच आगारांतून बस सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

वर्धा : रापमचे कर्मचारी २८ ऑक्टोबरपासून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांतील निम्म्याहून अधिक कर्मचारी अजूनही आंदोलनात सहभागी असले तरी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यामुळे काही आगारातून प्रवासी वाहतुकीसाठी बस सोडल्या जात आहेत. एकूणच २३६ कर्मचाऱ्यांच्या जोरावर सध्या एसटी सुसाट धावत आहे. सद्य:स्थितीत ६८ बस दररोज किमान १९ हजार किमीचा प्रवास करून नागरिकांना प्रवासी वाहतूक सेवा देत आहे.

एकूण बस २१३, रस्त्यावर ६८

जिल्ह्यात रापमचे पाच आगार असून एकूण २१३ बस आहेत. या बस आंदोनापूर्वी या बस दररोज किमान ७५ हजार किमीचा प्रवास पूर्ण करून नागरिकांना प्रवासी वाहतुकीची सेवा द्यायच्या; पण आंदोलनानंतर व काही कर्मचारी कर्तव्यावर रजू झाल्याने केवळ ६८ बसच रस्त्यावर धावत असून त्या दररोज १९ हजार किमीचा प्रवास प्रत्येक दिवशी पूर्ण करीत आहे.

नवीन नियुक्त ५६ चालकाच्या हाती स्टिअरिंग

रामप कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ब्रेक लागावा म्हणून काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर काहींना कार्यमुक्त करण्यात आले; परंतु अजूनही आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशातच खाजगी कंपनीकडून चालकांची भरती करण्यात आली असून जिल्ह्यात ५६ चालक नेमण्यात आले आहे. त्यांच्या हाती आता रामपच्या लालपरीचे स्टेअरिंग दिले जात आहे.

७५० कर्मचारी आंदोलनात कायमच

रापमच्या कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाचा लढा दिला जात असून काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील पाच आगारांतील तब्बल ७५० कर्मचारी आंदोलनात सहभाग दर्शवून विलीनीकरणाचा लढा देत आहेत.

रापम कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी जिल्ह्यातील सर्वच आगारांत नवीन कंत्राटी चालकांच्या मदतीने सर्वच आगारांतून बस सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आर्वी आगारात ७० कर्मचारी रुजू झाले असून तीन चालक कंत्राटी पद्धतीने आहेत. आर्वी आगारातून २३ बसच्या माध्यमातून ९० फेऱ्या सुरू आहे.

- विनोद खंडार, वाहतूक नियंत्रक, बसस्थानक आर्वी.

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलन