शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

२३६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी सुसाट, प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 18:19 IST

रापम कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी जिल्ह्यातील सर्वच आगारांत नवीन कंत्राटी चालकांच्या मदतीने सर्वच आगारांतून बस सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

वर्धा : रापमचे कर्मचारी २८ ऑक्टोबरपासून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांतील निम्म्याहून अधिक कर्मचारी अजूनही आंदोलनात सहभागी असले तरी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यामुळे काही आगारातून प्रवासी वाहतुकीसाठी बस सोडल्या जात आहेत. एकूणच २३६ कर्मचाऱ्यांच्या जोरावर सध्या एसटी सुसाट धावत आहे. सद्य:स्थितीत ६८ बस दररोज किमान १९ हजार किमीचा प्रवास करून नागरिकांना प्रवासी वाहतूक सेवा देत आहे.

एकूण बस २१३, रस्त्यावर ६८

जिल्ह्यात रापमचे पाच आगार असून एकूण २१३ बस आहेत. या बस आंदोनापूर्वी या बस दररोज किमान ७५ हजार किमीचा प्रवास पूर्ण करून नागरिकांना प्रवासी वाहतुकीची सेवा द्यायच्या; पण आंदोलनानंतर व काही कर्मचारी कर्तव्यावर रजू झाल्याने केवळ ६८ बसच रस्त्यावर धावत असून त्या दररोज १९ हजार किमीचा प्रवास प्रत्येक दिवशी पूर्ण करीत आहे.

नवीन नियुक्त ५६ चालकाच्या हाती स्टिअरिंग

रामप कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ब्रेक लागावा म्हणून काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर काहींना कार्यमुक्त करण्यात आले; परंतु अजूनही आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशातच खाजगी कंपनीकडून चालकांची भरती करण्यात आली असून जिल्ह्यात ५६ चालक नेमण्यात आले आहे. त्यांच्या हाती आता रामपच्या लालपरीचे स्टेअरिंग दिले जात आहे.

७५० कर्मचारी आंदोलनात कायमच

रापमच्या कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाचा लढा दिला जात असून काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील पाच आगारांतील तब्बल ७५० कर्मचारी आंदोलनात सहभाग दर्शवून विलीनीकरणाचा लढा देत आहेत.

रापम कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी जिल्ह्यातील सर्वच आगारांत नवीन कंत्राटी चालकांच्या मदतीने सर्वच आगारांतून बस सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आर्वी आगारात ७० कर्मचारी रुजू झाले असून तीन चालक कंत्राटी पद्धतीने आहेत. आर्वी आगारातून २३ बसच्या माध्यमातून ९० फेऱ्या सुरू आहे.

- विनोद खंडार, वाहतूक नियंत्रक, बसस्थानक आर्वी.

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलन