शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

६०० हेक्टरवर संत्र्याची फळ गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) परिसरात मुसळधार पाऊस झाला. याच पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर तर संत्रा या फळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संत्रा पिकावर बुरशी सदृष्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. इतरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात फळगळतीही झाली.

ठळक मुद्देपावसाचा फटका : नैसर्गिक आपत्तीच्या नियमावलीत मिळणार १८ हजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. इतकेच नव्हे तर संत्रा उत्पादकांच्या अडचणीत मोठी भर टाकली आहे. जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यात संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात असले तरी ऑक्टोबरच्या अखेरच्या आवठड्यात परिसरात झालेल्या पावसामुळे तब्बल ६०० हेक्टरवरील संत्रा पिकाची फळ गळ झाली असून तशी नोंद कृषी विभागाने घेतली आहे. तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असला तरी कुठल्या नियमावलीत बसवून संत्रा उत्पादकांना शासकीय मदत द्यायची असा पेच सध्या कायम आहे. शासनाने जर नैसर्गिक आपत्तीच्या नियमावलीत नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना समाविष्ट केल्यास त्यांना हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) परिसरात मुसळधार पाऊस झाला. याच पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर तर संत्रा या फळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संत्रा पिकावर बुरशी सदृष्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. इतरच नव्हे तर मोठ्या प्रमाणात फळगळतीही झाली. शेतकऱ्यांकडून ओरड झाल्यानंतर कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील एकूण ६०० हेक्टरवरील संत्रा पिकाची फळ गळती झाल्याची नोंद घेण्यात आली. शिवाय तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नुकसानग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाकडून भरीव मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनाही आहे.जर शासनाने संत्रा पिकाचे झालेल्या नुकसानाची भरपाई नैसर्गिक आपत्तीच्या नियमांना केंद्रस्थानी ठेऊन दिली तर संत्रा उत्पादकांना हेक्टरी १८ हजार रुपये शासकीय मदत मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. असे असले तरी हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.सिंचितला १३,५०० अन् फळ पिकांना १८ हजार शासकीय मदतीची शक्यताआॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याची माहिती गोळा करीत सर्वेक्षण करून पंचनामे केले जात आहेत. सदर काम सध्या कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तयार होणारा अंतिम अहवाल जिल्ह्यातील तीन बड्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासन दरबारी सादर केला जाणार आहे. त्यानंतरच शासनाकडून नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीपोटी शासकीय मदत द्यायची की नाही याविषयी हिरवी झेंडी दिली जाणार आहे. जुनेच निकष केंद्रस्थानी ठेऊन शासनाने ३३ टक्केच्यावर नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर केल्यास सिंचित पिकांना हेक्टरी १३ हजार ५००, फळ पिकांसाठी १८ हजार तर हंगामी पिकांना ६ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर शासकीय मदत मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६०० हेक्टरवरील संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या पिकांची मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. शिवाय इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. नेमके किती नुकसान झाले याची माहिती घेत पंचनामे पूर्ण केले जात आहेत. सरते शेवटी अंतिम अहवाल तयार करून तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत द्यायची की नाही याचा निर्णय शासन घेणार आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.परतीच्या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक नुकसानपरतीच्या पावसामुळे जिल्ह्यात नेमके किती नुकसान झाले याबाबतच्या आकडेवारीची जुळवाजुळव सध्या कृषी आणि महसूल विभागाकडून केली जात आहे. परतीच्या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सुरूवातीला पुढे आले होते. परंतु, प्रत्यक्ष सर्वेक्षणात हा आकडा बऱ्यापैकी वाढत आहे.समुद्रपूर तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून कृषी विभागाकडून सध्या युद्धपातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास सर्वाधिक नुकसान समुद्रपूर तालुक्यात झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :agricultureशेती