शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारल्याने कपाशी जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:31 IST

यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक जोमात बहरले. सततच्या पावसाने पिकासोबत तणही चांगलेच वाढले. शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्यासाठी कपाशी पिकात तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र, फवारणीने गवतासोबत कपाशीचे पीक पूर्णत: जळाले.

ठळक मुद्देकपाशीवर केलेला खर्च गेला वाया : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक जोमात बहरले. सततच्या पावसाने पिकासोबत तणही चांगलेच वाढले. शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्यासाठी कपाशी पिकात तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र, फवारणीने गवतासोबत कपाशीचे पीक पूर्णत: जळाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा प्रकार घडला. त्यामुळे शेतकºयांवर संकट कोसळले आहे.मौजा चिकणी परिसरात दोन-तीन शेतकºयांच्या शेतात असाच प्रकार घडला. देवळी येथे रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्यांने मौजा चिकणी येथे सात एकर शेत एक वर्षाकरीता ठेक्याने केले. संबंधित शेतकऱ्याने सातही एकर शेतात कपाशी पिकाची लागवड केली. गत १०-१२ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पिकापेक्षा गवतच अधिक प्रमाणात वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्याकरिता मजुरांकडून कपाशी पिकाच्या शेतात तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र, याचा विपरित परीणाम होऊन शेतातील कपाशीचे पीकच जळाले. यात संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.संततधार पावसामुळे आता शेतात पाणी साचलेले असल्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. फवारणीत औषधीची मात्रा अधिक अधिक झाली की काय, अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.नगदी पीक जळाल्यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. यामुळे शेतीचे संपूर्ण अर्थकारणच विस्कटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मजूव मिळत नसल्याने अशा घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे बोलत आहेत.मजुरांअभावी करावी लागते तणनाशकाची फवारणी१०-१२ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे कपाशीच्या शेतात अधिक गवत वाढले. चार-पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकरी निंदण करण्याकरिता महिला मजुरांच्या मागावर आहेत. परंतु, महिला मजुरांची कमतरता असल्यामुळे व सर्व शेतकऱ्यांचे निंदणाचे काम एकाच वेळेस आल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. तसेच मजुरांचे दरही न परवडणारेच आहे. पूर्वी महिला मंजूर दिवसभर निंदणाचे काम करायच्या; परंतु हल्ली मात्र तसेच राहीले नाही. घड्याळाच्या तासाप्रमाणे निंदण करतात. सकाळी ७ ते ९, ८ ते १, १० ते ५ अशा वेळा ठरल्या आहेत. तसेच ८ ते ३ या वेळेचे ७०, २००, २५० रुपये याप्रमाणे महिला मजुरांचे दर ठरले आहेत. इतके असूनसुद्धा मजूर मिळणे अवघड झाले आहे. यामुळेच गवत काढण्याकरिता तणनाशकाचा उपयोग करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांना गवत काढायची घाई असते, कारण खत देणे, कीटकनाशक, पिकाची पत सुधारण्याकरिता टॉनिक औषधी फवारणी, डवरणी आदी कामे उरकवायची असतात. याकरिता गवत काढणे गरजेचे असते.- शेतातील पाणी बाहेर काढावे, मलूल झालेल्या झाडांच्या बुडात २ ते ३ ग्रॅम युरिया द्यावा, कपाशीचे झाड पायाच्या बोटात धरून दाबावे, कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया अधिक १५० ग्रॅम पोटॅश प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रतिझाड १५० ते १५० मिली ड्रेनचिंग करून द्यावे व याच द्रावणाची पिकावर फवारणी करावी . परत ४ दिवसांनी १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा १० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड १०० मिली द्रावण बुडात ओतावे. एक जरी झाड मलूल झालेले दिसले तरी वरील उपाययोजना दिसताक्षणी सुरू करणे गरजेचे आहे, कारण प्रसार अती वेगाने होतो.- टी. ए. घायतिडकतालुका कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी