शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंस्फूर्तपणे अन् शांततेत वर्धेकरांनी पाळला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 23:44 IST

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती.

ठळक मुद्देशहिदांच्या स्मरणार्थ व्यापाऱ्यांनी काढला शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. याला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद देत शांततेत बंद पाळला.स्थानिक व्यापाºयांनी शनिवारी सकाळी एकत्र येत वर्धा शहरातून शहिदांच्या स्मरणार्थ मोर्चा काढला. मोर्चा कच्छी लाईन येथे पोहोचल्यावर तेथे पुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यापाºयांच्या मोर्चाने ‘अमर रहे शहीद, जवान अमर रहे’ अशा घोषणा देत वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने क्रमण केले. शनिवारी वर्धा शहरातील कापड व्यावसायिक, सराफा, अनाज व्यावसायिक, कृषी व्यावसायिक, औषधी विक्रेता आदींनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. पुलवामा येथील घटनेचा बदला घेत, दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचला, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.कार्यालये सुरूचशनिवारी बंदच्या हाकेला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बहुतांश व्यापाºयांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. मात्र, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुरू होती. शिवाय रापमची बससेवाही सुरू राहिल्याने विविध कामानिमित्त संबंधित कार्यालयांमध्ये येणाºयांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही.कापड व्यावसायिक पाठविणार शहिदांच्या परिवारांसाठी निधीपुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणी करून निधी पाठविण्याचा मानस स्थानिक कापड व्यावसायिकांचा आहे. त्या अनुषंगाने वर्र्ध्यातील १५३ कपडा व्यावसायिक प्रत्येकी ५०० रुपये गोळा करून ती रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाने शहीद परिवारासाठी तयार केलेल्या बँक खात्यात जमा करणार आहेत. त्यानंतर ही रक्कम बँकेच्या सहकार्याने शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडे वळती होणार असल्याचे टिबडीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला