शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शहरात पोलीस, महसूल, नगरपालिकेच्या एकूण नऊ पथकांनी विशेष प्रयत्न केले. सक्तीच्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालन होतेय काय याची प्रत्यक्ष पाहणी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, वर्धा न. प. चे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी वर्धा शहराचा फेरफटका मारून केली. रविवारी शहरातील औषधीची दुकाने वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.

ठळक मुद्दे२५ कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक : बेशिस्तांवर पोलीस, महसूल, राजस्व विभागाच्या पथकाने केली दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३६ तासांची सक्तीची संचारबंदी जाहीर करण्यात आली. या संचारबंदीच्या काळात प्रत्येक नागरिकाने घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रविवारी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. असे असले तरी रविवारी जिल्ह्याचे मुख्यालय असलेली वर्धा बाजारपेठ बंद राहिल्याने सुमारे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला होता.सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शहरात पोलीस, महसूल, नगरपालिकेच्या एकूण नऊ पथकांनी विशेष प्रयत्न केले. सक्तीच्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालन होतेय काय याची प्रत्यक्ष पाहणी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, वर्धा न. प. चे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी वर्धा शहराचा फेरफटका मारून केली. रविवारी शहरातील औषधीची दुकाने वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रत्येक व्यक्तीला थांबवून केली जात होती विचारपूससक्तीच्या संचारबंदीदरम्यान प्रत्येक नागरिकाने घरात थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. इतकेच नव्हे अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांच्यावतीने नाकेबंदी करण्यात आली होती. या नाकेबंदी दरम्यान प्रत्येक व्यक्तीला थांबवून पोलीस कर्मचारी विचारपूस करीत होते. कुणी विनाकारण घराबाहेर पडला आहे हे स्पष्ट होताच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अनेकांनी विवाहसोहळे ढकलले पुढे

रविवार २१ फेब्रुवारी हा लग्नाचा मुहूर्त होता. अनेकांनी मंगलकार्यालय आरक्षीत करून याच दिवशी विवाहसोहळे आयोजित केले होते. परंतु, २० पेक्षा जास्त लोकांना लग्नसोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याने काहींनी विवाह सोहळे पुढे ढकलले तर काहींनी बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह सोळा पार पाडला. पार पडलेल्या विवाह साेहळ्यादरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यात आले. 

जिल्हा सामान्य रुग्णालय होते अलर्टवररविवारी संचारबंदीमुळे वर्धा शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदी होती. परंतु, कुठल्याही रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी अलर्टवर होते.

शहरातील मुख्य बाजापेठ होती पुर्णपणे बंदकोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ३६ तासांच्या संचारबंदीमुळे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील संपूर्ण बाजारपेठ केवळ औषधीची दुकाने वगळता पूर्णपणे बंद होती.

रापमला बसला २५ लाखांचा फटकासक्तीच्या संचारबंदीदरम्यान रविवारी खासगी ट्रॅव्हल्ससह राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद होती. ३६ तासांच्या सक्तीच्या संचारबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी बसेस जिल्ह्यातील पाचही आगारात उभ्या होत्या. त्यामुळे रापमचा ३६ तासांच्या संचारबंदीचा किमान २५ लाखांचा आर्थिक फटका बसला.बसस्थानक होते ओससक्तीच्या संचारबंदीदरम्यान रापमची बससेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्याने ऐरवी प्रवाशांनी गजबजून राहणारे वर्धा बसस्थानक रविवारी मात्र ओस होते. 

प्रमुख रस्ते होते निर्मनुष्यवर्धा शहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, शास्त्री चौक, सोशालिस्ट चौक, अंबीका चौक या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतु, रविवारी सक्तीच्या संचारबंदीमुळे शहरातील या महत्त्वाच्या ठिकाणांसह इतर भागातील रस्ते निर्मनुष्य होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या