शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पटसंख्या वाढविण्यासाठी यंदाही पालक संपर्क अभियान

By admin | Updated: April 21, 2016 02:27 IST

शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते.

२५ ला प्रारंभ : आरटीईअंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरूवर्धा : शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते. या अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पुन्हा याच धर्तीवर हे अभियान यंदाही राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, अशी माहिती जि.प. शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.या अभियानाला येत्या २५ एप्रिलला समुद्रपूर पंचायत समिती येथून प्रारंभ करण्यात येणार असून ३० एप्रिलपर्यंत ते चालणार आहे. या अभियानांतर्गत पालकांना जिल्हा परिषद शाळांचे वैशिष्ट्ये समजावून आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घ्यावा, असा विनंतीवजा आग्रह करणार असल्याचेही आंबटकर म्हणाले. अभियान राबविताना शैक्षणिक व्यावसायिक पात्रता असलेले शिक्षक, संगणकीकृत शाळा, डिजिटल शाळा, इ-लर्निंग शाळा, मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध, उपस्थिती भत्तावाटप योजना, शिष्यवृत्ती योजना, क्रीडांगणाची सोय, स्वच्छ-शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, बोलक्या भिंती असलेल्या वर्ग खोल्या व शाळा, ज्ञानरचनावादानुसार अध्यापन, कृतीयुक्त अध्यापन पद्धतीवर आधारीत अध्यापन या बाबी पालकांना समजावून सांगणार असल्याची माहितीही आंबटकर यांनी यावेळी दिली. यावेळी समाजकल्याण सभापती वसंत पाचोडे, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, किशोर चौधरी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)