शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:40 IST

दिव्यांगांच्या विकासाकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात सिंदी (मेघे) ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे.

ठळक मुद्देप्रहारचे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीत आंदोलन : बेशरमाचे झाड देत नोंदविला निषेध

आॅनलाईन लोकमतवर्धा : दिव्यांगांच्या विकासाकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात सिंदी (मेघे) ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात निवेदन देवूनही कार्यवाही झाली नसल्याने सोमवारी प्रहारच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी सिंदी (मेघे) ग्रा.पं. कार्यालय गाठले. यावेळी ग्रा.पं. कार्यालयात ग्रा.पं. सचिव गैरहजर असल्यने आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला बेशरमाचे झाड देवून निषेध नोंदविला.या ग्रामपंचायतीत सन २०११ पासूनचा अपंगाचा ३ टक्के निधी अद्यापपर्यंत खर्च केलेला नाही. शासन निर्णय असून सुद्धा समाजातील सर्वात दुर्बल घटकाला या निधीपासून वंचित ठेवले आहे. तसेच सदर निधीचा दूरउपयोग झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिवाय याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग बांधवांना अपमानास्पद वागणूक देत या निधीपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकारचे निवेदन ग्रामपंचायतमध्ये द्यायला प्रहारचे कार्यकर्ते गेले असता ग्रामसेवक नसल्याने विकास दांडगे यांच्या नेतृत्वात त्यांच्या खुर्ची व टेबलवर बेशरमचे झाड व फुल ठेवून खूर्चीला निवेदन लावण्यात आले. प्रथम प्रहारच्या पदाधिकाºयांनी ग्रामसेवक धनविज यांना विचार केली असता ते उपलब्ध नव्हते. त्यांच्या भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता तो बंद होता. कर्मचाºयांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे पंचायत समितीशी संपर्क साधण्यात आला. याचाही उपयोग झाला नसल्याने संतप्त आंदोलकांनी ग्रामपंचायतीत घोषणाबाजी केली.यावेळी हनुमंत झोटींग, प्रमोद कुरटकर, विजय सुरकार, भूषण येलेकार, नितेश चातुरकर, उमेश गुरनुले, अरविंद मसराम, किशोर लोखंडे, प्रशिल धांदे, शुभम भोयर, महेंद्र इखार, प्रफुल साखरकर, चंद्रशेखर पवार, अजय चंदनखेडे, सुवर्णा वाघमारे उपस्थित होते.निधी खर्च करण्यात सेलू पं.स. उदासीनसेलू - शासननिर्णयानुसार अपंगांसाठी राखीव असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात येथील पंचायत समितीच्या अधिकाºयांना उत्सुकता नसल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन दिसत आहे. सन २०११ ते आजपर्यंतचा निधी खर्चच केला गेला नसल्याने अपंग बाधंवाप्रती असलेला पंचायत समिती प्रशासनाचा सवतासुभा चव्हाट्यावर आला आहे. ंशासन निर्णयानुसार सन २०११ च्या कृती आराखड्यानुसार सन २०११ ते आजपर्यंतचा पंचायत समितीच्या वार्षिक उत्पन्नातून ३ टक्के निधी अपंगांच्या विकास कार्यावर खर्च करणे सक्तीचे आहे.परंतु सेलू पंचायत समितीला कदाचित शासननिर्णयाचा विसर पडल्याचे दिसत आहे. सदर पंचायत समितीने आजच्या तारखेपर्यंत अपंगांसाठी राखीव असलेला ३ टक्के निधी खर्चच केला नाही. हा ३ टक्के निधी खर्च झाला पाहिजे, याकरिता प्रहार अपंगक्रांती संघटना सेलू तालुकास्तरावर सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती समोर आंदोलन झाले होते. परंतु आता पुन्हा त्यांना कदाचित शासननिर्णयाचा विसर पडल्याचे दिसत आहे. शासन निर्णय असतानाही सुध्दा अपंगांसाठीचा राखीव निधी सात वर्षांपासून अखर्चितच राहावा ही एक शोकांतिकाच असल्याचा आरोप होत आहे. हा निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटनेद्वारे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर केले आहे.