शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

विशेष पालक संपर्क अभियान

By admin | Updated: April 23, 2015 01:46 IST

दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे.

वर्धा : दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे ही संख्या वाढविण्यासाठी तसेच पालकांना इतर शाळेत मुलांना टाकण्यास परावृत्त करण्यासाठी जि. प. च्या वतीने २४ एप्रिल ते २ मे २०१५ या कालावधीत विशेष पालक संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध आहे. तसेच उच्च विद्याविभुषित शिक्षक वर्गही कार्यरत आहे. जवळ पास ३० टक्के शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प सुरू आहे. १०० टक्के शाळांमधून गणित व विज्ञान हे विषय सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविले जातात. अनेक होतकरून शिक्षक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल शाळा निर्माण करीत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. १४ वर्षाखालील वयोगटामधील राज्यस्तरीय संघात जास्तीत जास्त विद्यार्थी हे जिल्हा परिषदेचेच आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांची संनियंत्रण तपासणी व मार्गदर्शन करण्याकरिता अनुभवी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांची सक्षम पर्यवेक्षीय यंत्रणा कार्यरत आहे. याचबरोबरच भौतिक व तांत्रिक सर्व सोयी उपलब्ध असताना ही जिल्हा परिषद शाळांचे यश समाजासमोर योग्य पद्धतीने मांडल्या जात नसल्याने दिवसेंदिवस पटसंख्या घटत असल्याचे दिसून येते.या सर्व बाबी विचारात घेता शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये सर्व जिल्हा परिषद शाळांची एकूण पटसंख्या १० टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विशेष पालक संपर्क अभियान २४ एप्रिल ते २ मे २०१५ या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत जि. प. शाळांच्या शिक्षकांनी पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या सर्व सुविधांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंत्रणेच्या सर्व घटकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जि. प. चे शिक्षण व आरोप्ग्य सभापती मिलिंद भेंडे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)