शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

सोयाबीनला फुटले कोंब; तालुक्यातील शेतकरी मारतोय बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. नदी व नाल्यांच्या काठावरील काही शेतकऱ्यांचे उभे पीक पुरामुळे वाहून गेले, तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले आहे. याचाच विपरित परिणाम सध्या उभ्या पिकांवर झाला असून, आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे.

सुरेंद्र डाफलोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सततच्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांच्या एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने मायबाप सरकार हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता का हो, अशी बोंब मारत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.मागील १५ दिवसांपासून तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. नदी व नाल्यांच्या काठावरील काही शेतकऱ्यांचे उभे पीक पुरामुळे वाहून गेले, तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले आहे. याचाच विपरित परिणाम सध्या उभ्या पिकांवर झाला असून, आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे. नुकसान झालेल्या उभ्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांचा समावेश आहे.सध्या शेतकरी सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत असले तरी ढगाळ वातावरण तसेच उसंत घेत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या  शेंगानाच कोंब फुटले आहेत. एकूणच तालुक्यातील शिरपूर, जळगाव, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, वर्धमनरी, मांडला, निंबोली (शेंडे), राजापूर, कर्माबाद, अहिरवाडा, खुबगाव, पाचेगाव, बोरगाव, दहेगाव (मु.) आदी गावांमधील उभ्या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. शासन नुकसान भरपाई देते काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

उत्पादनात येणार घट- सततच्या पावसाचा आर्वी तालुक्यातील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांना सध्या कोंब फुटले असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयबीनच्या  शेंगांना कोंब फुटले असून, शासनाने नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी.- भास्कर चौकोने, शेतकरी, दहेगाव (मु.).

पावसामुळे तालुक्यातील किती हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले, याचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, तूर व कापूस पिकाला बसला आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.- एस. व्ही. वायवळ,  तालुका कृषी अधिकारी, आर्वी. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती