शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा पेरा घटण्याचे संकेत

By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST

तालुक्यात येत्या खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यात वाढ होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचेही प्रमाण यंदा कमी असणार अशी शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

घोराड : तालुक्यात येत्या खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यात वाढ होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचेही प्रमाण यंदा कमी असणार अशी शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत दिसत आहे.२०१३-१४ च्या खरीप हंगामात २०.८७१ हेक्टर च्या आसपास कापसाची लागवड तालुक्यात करण्यात आली होती. तर १९.००५ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला होता. पण गेल्या खरीप हंगामात पेरणी झाल्यापासूनच दमदार पावसाने लावलेल्या हजेरीचे रूपांतर अतिवृष्टी झाल्याने शेती खरडून निघाली. त्यामुळे पराटी पिकांची नासाडी झाली. तद्नंतर सोयाबीन कापणी व मळणीच्या वेळी आलेल्या सततच्या पावसाने सोयाबीन ओलेचिंब झाले. याचा फटका बसून भाव घसरले. त्यामुळे विविध कंपण्यानी सध्या विक्रीस आणलेली सोयाबीनची बियाणे महागली आहे. पण पेरल्यानंतर ती योग्य प्रकारे उगवतील का, याबाबत शेतकरी साशंक असून पराटी पेरण्याकडेच शेतकरी वर्गाचा कल दिसत आहे. यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या कारणाने नोयोजन कसे करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. पण गत वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे क्षेत्रात घटणार असून कापसाचे क्षेत्र वाढणार असे चित्र दिसत आहे. पीक कुठलेही असो पण निसर्गाने साथ द्यावी आणि पिकाला चांगला भाव मिलावा अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे.मृग नक्षत्र सुरू आहे. मात्र पाऊस न आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.(वार्ताहर)