शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘ते’ सोयाबीन बियाणे सदोषच

By admin | Updated: November 8, 2014 01:32 IST

महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीवरुन सदर बियाण्यांचे नमुने वर्धेच्या ...

आष्टी (शहीद) : महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीवरुन सदर बियाण्यांचे नमुने वर्धेच्या गुणनियंत्रण पथकाकडे पाठविले. चार महिन्यांनी दिलेल्या अहवालात सदर बियाणे सदोष असल्याचे म्हटले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सुनील देशमुख, अनिल राणे, विठ्ठल सहारे या तिघांनी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाकडून महाबिज कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले़ १२ जुलै २०१४ रोजी सोयाबीन जे़एस़ ३३५ वाणाचे लॉट नंबर ११९५, ११९२, सिरीजच्या नऊ बॅग खरेदी केल्या़ त्याची पेरणी १७ जुलै २०१४ रोजी केली़ बियाण्यांची उगवण आठवडाभरात होते़; मात्र दहा-बारा दिवस लोटले तरी देखील बियाणे उगवले नाही़ पेरणीसाठी आलेला खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे २८ जुलै २०१४ रोजी लेखी तक्रार केली़ संबंधित अधिकाऱ्यांनी मोक्कापाहणी करण्याचे आश्वासन दिले़ त्यानुसार २ आॅगस्ट २०१४ रोजी शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी बाळासाहेब वेरूळकर यांनी पाहणी केली़ बियाण्यांची गुणनियंत्रण निरीक्षक बाब पूर्ण झाल्यावर लागलीच अहवाल देण्याचे सांगितले़ बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ शासनाच्या अधिकृत महाबिजवरही विश्वास राहिला नाही, अशी प्रतिक्रीया शेतकरी देशमुख, राणे, सहारे यांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केले़(प्रतिनिधी)