शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सोयाबीन बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत उपलब्ध; शेतकऱ्यांनो असा घेता येणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:21 IST

Vardha: २९ मे पर्यंत शेतकऱ्यांना करता येणार बियाण्यासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रमाणित सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २९ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत अशा महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.g ov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेताना अॅग्रिस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ५ वर्षाच्या आतील बियाणे तालुकास्तरावरील डीलरकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करून घेता येणार आहे.

एक हेक्टरसाठी बियाणेयोजनेचा लाभ किमान २० आर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी घेता येईल. बीबीएफ, रुंद वरंबा सरी, टोकन पद्धतीने लागवडीकरिता एकरी २२ किलो, याप्रमाणे एका शेतकऱ्यास जास्तीतजास्त २ बॅगचा लाभ दिला जाणार आहे.

अशी होणार निवडपीक प्रात्याक्षिकाची अंमलबजावणी करताना, शेतकरी निवड सर्वसाधारण ७५ टक्के, अनुसूचित जाती १७टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के याप्रमाणे करण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांपैकी ३० टक्के महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्याच्या याद्या २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोर्टलवर उपलब्ध होर्डल. तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर वैयक्तिक संदेशही प्राप्त होतील. ५ दिवसांच्या आत बियाण्याची उचल करून घेणे आवश्यक आहे.

तूर व सोयाबीन प्रात्यक्षिकासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणेपात्र लाभार्थी- जे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांची २४ मार्च २०२४ पूर्वी आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी संस्थाकडे नोंदणी आहे. अशा शेतकरी गटांना तूर आणि सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिकाकरिता १०० टक्के अनुदानावर मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

"या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहे. विशेषतः सोयाबीन लागवडीसाठी होणारा बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोफत बियाणे योजनेचा लाभघ्यावा."- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.

टॅग्स :Soybeanसोयाबीनwardha-acवर्धा