शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

सोयाबीन बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत उपलब्ध; शेतकऱ्यांनो असा घेता येणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:21 IST

Vardha: २९ मे पर्यंत शेतकऱ्यांना करता येणार बियाण्यासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रमाणित सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २९ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत अशा महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.g ov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेताना अॅग्रिस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ५ वर्षाच्या आतील बियाणे तालुकास्तरावरील डीलरकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करून घेता येणार आहे.

एक हेक्टरसाठी बियाणेयोजनेचा लाभ किमान २० आर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी घेता येईल. बीबीएफ, रुंद वरंबा सरी, टोकन पद्धतीने लागवडीकरिता एकरी २२ किलो, याप्रमाणे एका शेतकऱ्यास जास्तीतजास्त २ बॅगचा लाभ दिला जाणार आहे.

अशी होणार निवडपीक प्रात्याक्षिकाची अंमलबजावणी करताना, शेतकरी निवड सर्वसाधारण ७५ टक्के, अनुसूचित जाती १७टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के याप्रमाणे करण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांपैकी ३० टक्के महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्याच्या याद्या २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोर्टलवर उपलब्ध होर्डल. तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर वैयक्तिक संदेशही प्राप्त होतील. ५ दिवसांच्या आत बियाण्याची उचल करून घेणे आवश्यक आहे.

तूर व सोयाबीन प्रात्यक्षिकासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणेपात्र लाभार्थी- जे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांची २४ मार्च २०२४ पूर्वी आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी संस्थाकडे नोंदणी आहे. अशा शेतकरी गटांना तूर आणि सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिकाकरिता १०० टक्के अनुदानावर मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

"या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहे. विशेषतः सोयाबीन लागवडीसाठी होणारा बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोफत बियाणे योजनेचा लाभघ्यावा."- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.

टॅग्स :Soybeanसोयाबीनwardha-acवर्धा