शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

तीन हजार हेक्टरने घटणार सोयाबीनचे क्षेत्र

By admin | Updated: May 24, 2014 23:49 IST

गत खरीप हंगामाच्या तुलनेत सन १४-१५ च्या हंगामात सोयाबीनचा पेरा तीन हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविला जात आहे. सोयाबीन कमी करून

घोराड : गत खरीप हंगामाच्या तुलनेत सन १४-१५ च्या हंगामात सोयाबीनचा पेरा तीन हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविला जात आहे. सोयाबीन कमी करून शेतकरी कपाशीची लागवड करणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.

४३ हजार ८९0 हेक्टर क्षेत्रात सेलू तालुक्यात खरीप हंगामाताचा पेरा करण्यात येत आहे. यात कपाशीची लागवड २१ हजार हेक्टरमध्ये करण्यात येणार आहे. यात एक हजार हेक्टरची वाढ अपेक्षित धरल्या गेली आहे. तर कृषी विभागाच्या खरीप नियोजनानुसार गत हंगामात १९ हजार हेक्टरमध्ये असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने कमी होवून १७ हजार हेक्टरवर राहील. तर ज्वारी ३00 हेक्टर तूर क्षेत्रात ४ हजार हेक्टरवरून पाच हजार ५00 हेक्टरवर पोहचतील तर इतर पिके ९0 हेक्टर मध्ये आहेत.

सन १३-१४ च्या हंगामात ४३ हजार ८७१ हेक्टरमध्ये असणार्‍या खरीप पीक क्षेत्रात यंदा १९ हेक्टरची वाढ दर्शविली आहे. खरीप हंगामासाठी १0 हजार ३३८ क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहे. कापूस पेरणीकरिता ९३ हजार ३३४ पाकीटे बियाणे लागतील तर रासायनिक खताची मागणी ८ हजार २१५ मेट्रीक टन असून १ हजार ३३५ मेट्रीक टन उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले. कृषी विभागाचे खरीप पिकाबाबतचे नियोजन झाले असले तरी शेतकर्‍यांचे नियोजन हे रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसाच्या हजेरीवर अवलंबुन राहिले आहे. शेतकर्‍यांनी मशागतीची कामे आटोपली असून त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)