शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

सोयाबीन @ 4925 शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने : वाढलेले भाव व्यापाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: May 10, 2014 02:36 IST

सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांचे सोयाबीन घरी ठेवले होते; मात्र दरवाढ होत नव्हती, अशात नव्या हंगामात पैशाची भासणारी चणचण अडचणीत आणत होती.

वर्धा : सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांनी त्यांचे सोयाबीन घरी ठेवले होते; मात्र दरवाढ होत नव्हती, अशात नव्या हंगामात पैशाची भासणारी चणचण अडचणीत आणत होती. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजने त्याचे सोयाबीन विकताच बाजारात सोयाबीनचे दर वाढले. जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात मोठी बाजारपेठ असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीन ४ हजार ९२५ रुपयात गेले. सोयाबीनच्या दराच्या आशेत असलेल्या शेतकर्‍यांच्या पदरात मात्र निराशाच आली. कापसाचे दर वाढत नाही शिवाय कापसाबद्दल शासनाचे धोरणही स्पष्ट नसल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहू लागले. पाहाता पाहता कापसापाठोपाठ सोयाबीन मुख्य पीक म्हणून समोर येवू लागले. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन गेले. जेवढे हाती राहिले तेवढ्याला उत्तम दर मिळेल अशी आशा त्यांना होती; मात्र जोपर्यंत शेतकर्‍यांच्या घरी सोयाबीन होते त्या काळापर्यंत सोयाबीचे दर ३ हजार ५०० रुपयांच्यी आसपास होते. यात अनेक शेतकर्‍यांनी आर्थिक कळ सोसत सोयाबीनचे दर वाढेल या आशेत सोयाबीन घरी ठेवले होते. मात्र दर वाढत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय खरीप हंगाम तोंडावर आला. या नव्या हंगामाची तयारी करण्याकरिता पैशाची चणचण असल्याने शेतकर्‍यांनी त्यांचे सोयाबीन विकणे सुरू केले. आज शेतकर्‍यांच्या घरी सोयाबीनचा एक दाना नसताना बाजारात सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात आजच्या घडीला असलेले सोयाबीन हे व्यापार्‍यांचे आहे. त्यांचे सोयाबीन पाच हजार रुपयात जात आहे. शेतकर्‍यांची पडती पाहून व्यापार्‍यांनी घेतलेले हे सोयाबीन आहे यात दुमत नाही. मात्र शेतकर्‍यांचे सोयाबीन संपल्यावर बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याने नेहमीच शेतकर्‍यांची पिळवणूक होते ती प्रथा अशीच कायम राहणार असल्याचे पुन्हा समोर आले आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीत एकाएकी सोयाबीनची अशी आवक वाढली.