शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन ठरतेय गुरांचा चारा

By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST

परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

तळेगाव (श्या़पं़) : परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यावर्षी तर सोयाबीनच्या शेतात अनेकांना गुरे सोडावी लागत आहेत़ काढणीचा खर्चही निघाला नाही. यामुळे यंदाचे सोयाबीन गुरांचा चाराच बनल्याचे दिसून येत आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी हतबल झाले आहेत़ नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे. आता सोयाबीन काढणीसाठी लागणारा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. पिकांचे सरासरी उत्पन्न अत्यल्प आहे. हेक्टरी एक ते दीड पोते उत्पादन होत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. अनेक शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेऊन सोयाबीन न काढता सोयाबीनच्या शेतात गुरे चरण्यासाठी सोडली आहेत. यावरून शेतकऱ्यांची विदारक स्थिती लक्षात येते़ सवंगणीलाही सोयाबीन परवडणारे नसल्याने गुरे चारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत़ कपाशीला भाव मिळत नाही आणि खर्चही अधिक करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती़ नगदी पीक म्हणूनही सोयाबीन पूढे आले होते; पण त्याच सोयाबीनमुळे शेतकरी आणखी कर्जात बुडताना दिसत आहेत़ सध्या खरीपातून कुठलेही उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा डोंगर कायम आहे. जुनेच कर्ज थकित असल्याने नवीन कर्ज मिळण्याची शक्यताही कमीच आहे़आता शेतकऱ्यांना केवळ शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानाचीच प्रतीक्षा असल्याचे दिसते़ झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)