शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

सोयाबीन ठरतेय गुरांचा चारा

By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST

परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

तळेगाव (श्या़पं़) : परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यावर्षी तर सोयाबीनच्या शेतात अनेकांना गुरे सोडावी लागत आहेत़ काढणीचा खर्चही निघाला नाही. यामुळे यंदाचे सोयाबीन गुरांचा चाराच बनल्याचे दिसून येत आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी हतबल झाले आहेत़ नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे. आता सोयाबीन काढणीसाठी लागणारा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. पिकांचे सरासरी उत्पन्न अत्यल्प आहे. हेक्टरी एक ते दीड पोते उत्पादन होत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. अनेक शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेऊन सोयाबीन न काढता सोयाबीनच्या शेतात गुरे चरण्यासाठी सोडली आहेत. यावरून शेतकऱ्यांची विदारक स्थिती लक्षात येते़ सवंगणीलाही सोयाबीन परवडणारे नसल्याने गुरे चारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत़ कपाशीला भाव मिळत नाही आणि खर्चही अधिक करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती़ नगदी पीक म्हणूनही सोयाबीन पूढे आले होते; पण त्याच सोयाबीनमुळे शेतकरी आणखी कर्जात बुडताना दिसत आहेत़ सध्या खरीपातून कुठलेही उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा डोंगर कायम आहे. जुनेच कर्ज थकित असल्याने नवीन कर्ज मिळण्याची शक्यताही कमीच आहे़आता शेतकऱ्यांना केवळ शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानाचीच प्रतीक्षा असल्याचे दिसते़ झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)