शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोयाबीन ठरतेय गुरांचा चारा

By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST

परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

तळेगाव (श्या़पं़) : परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यावर्षी तर सोयाबीनच्या शेतात अनेकांना गुरे सोडावी लागत आहेत़ काढणीचा खर्चही निघाला नाही. यामुळे यंदाचे सोयाबीन गुरांचा चाराच बनल्याचे दिसून येत आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी हतबल झाले आहेत़ नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे. आता सोयाबीन काढणीसाठी लागणारा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. पिकांचे सरासरी उत्पन्न अत्यल्प आहे. हेक्टरी एक ते दीड पोते उत्पादन होत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. अनेक शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेऊन सोयाबीन न काढता सोयाबीनच्या शेतात गुरे चरण्यासाठी सोडली आहेत. यावरून शेतकऱ्यांची विदारक स्थिती लक्षात येते़ सवंगणीलाही सोयाबीन परवडणारे नसल्याने गुरे चारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत़ कपाशीला भाव मिळत नाही आणि खर्चही अधिक करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती़ नगदी पीक म्हणूनही सोयाबीन पूढे आले होते; पण त्याच सोयाबीनमुळे शेतकरी आणखी कर्जात बुडताना दिसत आहेत़ सध्या खरीपातून कुठलेही उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा डोंगर कायम आहे. जुनेच कर्ज थकित असल्याने नवीन कर्ज मिळण्याची शक्यताही कमीच आहे़आता शेतकऱ्यांना केवळ शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानाचीच प्रतीक्षा असल्याचे दिसते़ झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)