शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरिपात नुकसान तरी शेतकऱ्यांकडून गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे क्षेत्र ९१ हजार ५६० इतके होते. एकूण सरासरी क्षेत्र ५१ हजार ५३८ हेक्टर असून पैकी सोमवारपर्यंत १९ हजार ८६८ म्हणजे हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ३८.५५ टक्के क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.रबी हंगामात आर्वी तालुक्यात सरासरी १५० हेक्टर, आष्टी (शहीद) तालुक्यात ५२४ हेक्टर, कारंजा (घाडगे) ९८८, वर्धा तालुक्यात १ हजार २७०, सेलू तालुक्यात ५ हजार ५००, देवळी तालुक्यात २ हजार २९५, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १३७.१, समुद्रपूर तालुक्यात ७ हजार ५ हेक्टरवर पेरण्या सोमवार, २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्याला यंदा अक्षरश: झोडपून काढले. सवंगणी केलेल्या सोयाबीनच्या गंज्या भिजल्याने अंकुर फुटले. कपाशीची बोंडेही काळपट आली. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र, नंतर पावसात फार मोठा काळ सातत्य राहिले. यामुळे पिकेही जोमात बहरली होती.यंदा चांगले उत्पन्न होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, परतीच्या पावसाने पिकांवर विपरित झाला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला.सोायाबीनचे दाणे ओलेच राहिल्याने बाजार समितीतही प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला. कपाशीची बोंडेच न फुटल्याने दसऱ्याला घरात येणारा कापूस अद्याप अनेकांच्या शेतातच आहे. खरिपातील या दोन्ही पिकांनी दगा दिल्याने अनेकांंचा लागवड खर्चदेखील निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरिपातील पिकांवरच शेतकऱ्यांचे नियोजन असते.मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कटले. असे असतानाही रबीच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून आता या हंगामातील पेरण्यांना गती आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.पेरण्यांमध्ये समुद्रपूर, सेलू आघाडीवररबी हंगामातील पेरणीमध्ये समुद्रपूर आणि सेलू तालुका आघाडीवर असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. तृणधान्य जसे मका, गहू, ज्वारी, कडधान्य- हरभरा व इतर, अन्नधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांच्या लागवडी जिल्ह्यातील समुद्रपूर आणि सेलू तालुक्याने आघाी घेतली आहे.ज्वारीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठजिल्ह्यात ज्वारी लागवडीचे ६६० हेक्टर नियोजन क्षेत्र होते. मात्र, ज्वारीची संपूर्ण जिल्ह्यात लागवडच करण्यात आली नाही. ज्वारी पिकाकडे शेतकरी दरवर्षीच पाठ फिरवित असल्याने चाराटंचाईचे संकटही जिल्ह्यात गडद होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेती