शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरिपात नुकसान तरी शेतकऱ्यांकडून गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे क्षेत्र ९१ हजार ५६० इतके होते. एकूण सरासरी क्षेत्र ५१ हजार ५३८ हेक्टर असून पैकी सोमवारपर्यंत १९ हजार ८६८ म्हणजे हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ३८.५५ टक्के क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.रबी हंगामात आर्वी तालुक्यात सरासरी १५० हेक्टर, आष्टी (शहीद) तालुक्यात ५२४ हेक्टर, कारंजा (घाडगे) ९८८, वर्धा तालुक्यात १ हजार २७०, सेलू तालुक्यात ५ हजार ५००, देवळी तालुक्यात २ हजार २९५, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १३७.१, समुद्रपूर तालुक्यात ७ हजार ५ हेक्टरवर पेरण्या सोमवार, २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्याला यंदा अक्षरश: झोडपून काढले. सवंगणी केलेल्या सोयाबीनच्या गंज्या भिजल्याने अंकुर फुटले. कपाशीची बोंडेही काळपट आली. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र, नंतर पावसात फार मोठा काळ सातत्य राहिले. यामुळे पिकेही जोमात बहरली होती.यंदा चांगले उत्पन्न होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, परतीच्या पावसाने पिकांवर विपरित झाला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला.सोायाबीनचे दाणे ओलेच राहिल्याने बाजार समितीतही प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला. कपाशीची बोंडेच न फुटल्याने दसऱ्याला घरात येणारा कापूस अद्याप अनेकांच्या शेतातच आहे. खरिपातील या दोन्ही पिकांनी दगा दिल्याने अनेकांंचा लागवड खर्चदेखील निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरिपातील पिकांवरच शेतकऱ्यांचे नियोजन असते.मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कटले. असे असतानाही रबीच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून आता या हंगामातील पेरण्यांना गती आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.पेरण्यांमध्ये समुद्रपूर, सेलू आघाडीवररबी हंगामातील पेरणीमध्ये समुद्रपूर आणि सेलू तालुका आघाडीवर असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. तृणधान्य जसे मका, गहू, ज्वारी, कडधान्य- हरभरा व इतर, अन्नधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांच्या लागवडी जिल्ह्यातील समुद्रपूर आणि सेलू तालुक्याने आघाी घेतली आहे.ज्वारीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठजिल्ह्यात ज्वारी लागवडीचे ६६० हेक्टर नियोजन क्षेत्र होते. मात्र, ज्वारीची संपूर्ण जिल्ह्यात लागवडच करण्यात आली नाही. ज्वारी पिकाकडे शेतकरी दरवर्षीच पाठ फिरवित असल्याने चाराटंचाईचे संकटही जिल्ह्यात गडद होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेती