शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरिपात नुकसान तरी शेतकऱ्यांकडून गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे क्षेत्र ९१ हजार ५६० इतके होते. एकूण सरासरी क्षेत्र ५१ हजार ५३८ हेक्टर असून पैकी सोमवारपर्यंत १९ हजार ८६८ म्हणजे हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ३८.५५ टक्के क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.रबी हंगामात आर्वी तालुक्यात सरासरी १५० हेक्टर, आष्टी (शहीद) तालुक्यात ५२४ हेक्टर, कारंजा (घाडगे) ९८८, वर्धा तालुक्यात १ हजार २७०, सेलू तालुक्यात ५ हजार ५००, देवळी तालुक्यात २ हजार २९५, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १३७.१, समुद्रपूर तालुक्यात ७ हजार ५ हेक्टरवर पेरण्या सोमवार, २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्याला यंदा अक्षरश: झोडपून काढले. सवंगणी केलेल्या सोयाबीनच्या गंज्या भिजल्याने अंकुर फुटले. कपाशीची बोंडेही काळपट आली. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र, नंतर पावसात फार मोठा काळ सातत्य राहिले. यामुळे पिकेही जोमात बहरली होती.यंदा चांगले उत्पन्न होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, परतीच्या पावसाने पिकांवर विपरित झाला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला.सोायाबीनचे दाणे ओलेच राहिल्याने बाजार समितीतही प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला. कपाशीची बोंडेच न फुटल्याने दसऱ्याला घरात येणारा कापूस अद्याप अनेकांच्या शेतातच आहे. खरिपातील या दोन्ही पिकांनी दगा दिल्याने अनेकांंचा लागवड खर्चदेखील निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरिपातील पिकांवरच शेतकऱ्यांचे नियोजन असते.मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कटले. असे असतानाही रबीच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून आता या हंगामातील पेरण्यांना गती आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.पेरण्यांमध्ये समुद्रपूर, सेलू आघाडीवररबी हंगामातील पेरणीमध्ये समुद्रपूर आणि सेलू तालुका आघाडीवर असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. तृणधान्य जसे मका, गहू, ज्वारी, कडधान्य- हरभरा व इतर, अन्नधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांच्या लागवडी जिल्ह्यातील समुद्रपूर आणि सेलू तालुक्याने आघाी घेतली आहे.ज्वारीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठजिल्ह्यात ज्वारी लागवडीचे ६६० हेक्टर नियोजन क्षेत्र होते. मात्र, ज्वारीची संपूर्ण जिल्ह्यात लागवडच करण्यात आली नाही. ज्वारी पिकाकडे शेतकरी दरवर्षीच पाठ फिरवित असल्याने चाराटंचाईचे संकटही जिल्ह्यात गडद होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेती