शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१०.११ टक्के पावसाच्या जोरावर झाली तब्बल १.१० लाख हेक्टरवर पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला असला तरी याच पावसाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल १.१० लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. अंकुरलेले पीक जगविण्यासाठी सध्या शेतकरी तारेवरची कसरत करीत असून दमदार पाऊस येईल, अशी आशा करीत जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणेच पावसाची प्रतीक्षा करीत आहे.मागील वर्षी २९ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२८.८८ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ सरासरी ८४.२९ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

१६ जुलैपर्यंत करता येते कपाशी, सोयाबीनची लागवड-  मृग पूर्ण तर निम्मे आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मोठा धोका पत्कारून सध्या शेतकरीही पेरणीच्या कामांना गती देत आहेत. -  पण १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात १.१० लाख हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड झाली आहे. शेत शिवारात पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करावे. १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येते.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती