शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

३.५० लाख क्विंटल सोयाबीन व्यापाऱ्यांच्या झोळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:58 IST

शेतकऱ्यांना हमीभाव मिळवा याकरिता शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली.

ठळक मुद्देशासकीय खरेदीत नियमांच्या अडचणी : शासनाची खरेदी आठ हजार क्विंटल

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांना हमीभाव मिळवा याकरिता शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली. या खरेदीत असलेले नियम शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापाºयांच्याच पथ्यावर पडले. परिणामी वर्धेत शासनाची खरेदी नाममात्र असून महिनाभऱ्यात ३ लाख ५० हजार ७६७ क्ंिवटल सोयाबीन व्यापाºयांच्या झोळीत गेले आहे.नाफेडच्यावतीने जिल्ह्यात नऊ ठिकाणी शासकीय सोयाबीनची खरेदी सुरू आहे. येथे होणारी खरेदी आॅनपद्धतीने होत असून शेतकऱ्यांना ही पद्धत पचणी पडत असल्याचे दिसून येत नाही. हमीभावाच्या अपेक्षेत होत असलेली धावपळ शेतकऱ्यांच्या वेळेत होत नसल्याने त्यांनी व्यापाºयांनाच सोयाबीन देण्याचा निर्णय घेतल्याचे वर्धेत दिसत आहे. वर्धेत असलेल्या केंद्रांवर आतापर्यंत २ हजार ३७ शेततकºयांची नोंद झाली आहे. यापैकी ५०१ शेतकºयांकडून ८ हजार ७७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. इतर शेतकºयांचे सोयाबीन अद्याप बाजारात आले नसल्याने त्यांचे सोयाबीन विकल्या जाईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.नाफेडच्या केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना एफएक्यू कमी असल्याच्या कारणावरून व्यापाºयांनी परत पाठविल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकºयांची ओरड झाल्याने सहकार मंत्र्यांनी नियम शिथील करून शेतकºयांचे सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना केल्या. या सूचना तोडी असून त्याचे कुठलेही पत्रक आले नसल्याने कर्मचाºयांकडून हे नियम कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. नाफेडच्या केंद्रावरून सोयाबीन नाकारल्यानंतर व्यापारीही त्याला दर देत नसल्याचे प्रकार घडत आहे. या शेतकºयांना व्यापाºयांकडून २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांपर्यंत दर देत असल्याचे दिसून आले आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत असून शासकीय केंद्रांवरील अटी शिथील करण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे कृषी खात्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.४१ शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारलेशासनाच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेवून आलेल्या तब्बल ४१ शेतकºयांचे सोयाबीन नियमांत बसत नसल्याचे कारण काढून परत पाठविले असल्याचे समोर आले आहे.याउलट एमएमएस येवूनही सुमारे ५०० शेतकऱ्यांनी या केंद्रावर सोयाबीन आणले नसल्याचे दिसून आले.अनेकांना एसएमएसची प्रतीक्षाहमीभावाच्या अपेक्षेत आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी ५०१ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले आहे. उर्वरीत शेतकºयांचे सोयाबीन अद्याप त्यांच्या घरीच आहे. त्यांना एसएमएस येण्याची प्रतीक्षा आहे. नाफेडचा एसएमएस आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री होईल, तीही नियमात बसेल तरच, अन्यथा त्यांनाही व्यापाऱ्यांच्या दारी जावे लागणार हे वास्तव आहे.हमीभावाकडे शेतकऱ्यांची पाठशेतमालाची आवक वाढत असताना शेतकऱ्यांकडून हमीभावाकडे शेतकºयांची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन असो वा कापूस दोन्ही प्रकारात शेतकरी हमीभावाकडे पाठ करीत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या केंद्रावर आॅनलाईन प्रकार असल्याने अनेकांकडून याकडे पाठ केल्याचे दिसते तर कापसाच्या खरेदीतही हाच प्रकार होत असल्याचे जिल्ह्यात दिसून आले आहे.