शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

३.५० लाख क्विंटल सोयाबीन व्यापाऱ्यांच्या झोळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:58 IST

शेतकऱ्यांना हमीभाव मिळवा याकरिता शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली.

ठळक मुद्देशासकीय खरेदीत नियमांच्या अडचणी : शासनाची खरेदी आठ हजार क्विंटल

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांना हमीभाव मिळवा याकरिता शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली. या खरेदीत असलेले नियम शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापाºयांच्याच पथ्यावर पडले. परिणामी वर्धेत शासनाची खरेदी नाममात्र असून महिनाभऱ्यात ३ लाख ५० हजार ७६७ क्ंिवटल सोयाबीन व्यापाºयांच्या झोळीत गेले आहे.नाफेडच्यावतीने जिल्ह्यात नऊ ठिकाणी शासकीय सोयाबीनची खरेदी सुरू आहे. येथे होणारी खरेदी आॅनपद्धतीने होत असून शेतकऱ्यांना ही पद्धत पचणी पडत असल्याचे दिसून येत नाही. हमीभावाच्या अपेक्षेत होत असलेली धावपळ शेतकऱ्यांच्या वेळेत होत नसल्याने त्यांनी व्यापाºयांनाच सोयाबीन देण्याचा निर्णय घेतल्याचे वर्धेत दिसत आहे. वर्धेत असलेल्या केंद्रांवर आतापर्यंत २ हजार ३७ शेततकºयांची नोंद झाली आहे. यापैकी ५०१ शेतकºयांकडून ८ हजार ७७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. इतर शेतकºयांचे सोयाबीन अद्याप बाजारात आले नसल्याने त्यांचे सोयाबीन विकल्या जाईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.नाफेडच्या केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना एफएक्यू कमी असल्याच्या कारणावरून व्यापाºयांनी परत पाठविल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकºयांची ओरड झाल्याने सहकार मंत्र्यांनी नियम शिथील करून शेतकºयांचे सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना केल्या. या सूचना तोडी असून त्याचे कुठलेही पत्रक आले नसल्याने कर्मचाºयांकडून हे नियम कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. नाफेडच्या केंद्रावरून सोयाबीन नाकारल्यानंतर व्यापारीही त्याला दर देत नसल्याचे प्रकार घडत आहे. या शेतकºयांना व्यापाºयांकडून २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांपर्यंत दर देत असल्याचे दिसून आले आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत असून शासकीय केंद्रांवरील अटी शिथील करण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे कृषी खात्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.४१ शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारलेशासनाच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेवून आलेल्या तब्बल ४१ शेतकºयांचे सोयाबीन नियमांत बसत नसल्याचे कारण काढून परत पाठविले असल्याचे समोर आले आहे.याउलट एमएमएस येवूनही सुमारे ५०० शेतकऱ्यांनी या केंद्रावर सोयाबीन आणले नसल्याचे दिसून आले.अनेकांना एसएमएसची प्रतीक्षाहमीभावाच्या अपेक्षेत आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी ५०१ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले आहे. उर्वरीत शेतकºयांचे सोयाबीन अद्याप त्यांच्या घरीच आहे. त्यांना एसएमएस येण्याची प्रतीक्षा आहे. नाफेडचा एसएमएस आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री होईल, तीही नियमात बसेल तरच, अन्यथा त्यांनाही व्यापाऱ्यांच्या दारी जावे लागणार हे वास्तव आहे.हमीभावाकडे शेतकऱ्यांची पाठशेतमालाची आवक वाढत असताना शेतकऱ्यांकडून हमीभावाकडे शेतकºयांची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन असो वा कापूस दोन्ही प्रकारात शेतकरी हमीभावाकडे पाठ करीत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या केंद्रावर आॅनलाईन प्रकार असल्याने अनेकांकडून याकडे पाठ केल्याचे दिसते तर कापसाच्या खरेदीतही हाच प्रकार होत असल्याचे जिल्ह्यात दिसून आले आहे.