शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

सोयाबीन बियाणं पेरलं; पण उगवलंच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

ठळक मुद्देसेलू तालुक्यातील २७ शेतकऱ्यांनी नोंदविली तक्रार : कृषी विभागाच्या पथकाने भेट देत केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : मृग नक्षत्रात पेरणीयोग्य झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली; मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतात बीज अंकुरलेच नसल्याने खरेदी केलेल्या बियाण्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीनंतर कृषी विभागाच्या चमूने २७ शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देत पंचनामा केला. यात विविध कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे.सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.त्यातील काही शेतकऱ्यांनी कंपन्यांशी जुळवूून घेत बियाणे घेऊन समाधान मानले, तर काहींनी तक्रारी केल्या. त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील शास्त्रज्ञ उंबरकर, तालुका कृषी अधिकारी राधिका बैरागी, मंडळ कृषी अधिकारी ढेंधरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुरारकर, चव्हाण, पर्यवेक्षक दांडेकर, सहाय्यक पांडे आदींनी कृषी विभागाच्या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यात आकोली येथील विशाल गोमासे, तर घोराड येथील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कंपन्यांकडून शेतकऱ्यांची बोळवणसोयाबीन बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पुन्हा मोफत बियाणे पुरवून शेतकºयांची बोळवण करण्याचा प्रकार सुरू आहे मात्र, बियाणे प्रमाणित करणारी टीम याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दखल घेणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही व पथकाने शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसा अहवाल तयार केला. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.बोगस बियाण्यांमुळे आर्थिक फटकाआंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन नामदेव कडू यांनी १० बॅग महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, बराच काळ लोटूनही बियाणे न उगवलेच नाही. यासंदर्भात कडू यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. नुकसानभरपाई देण्यासह बियाणे पास करणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी