शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

सोयाबीन बियाणं पेरलं; पण उगवलंच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

ठळक मुद्देसेलू तालुक्यातील २७ शेतकऱ्यांनी नोंदविली तक्रार : कृषी विभागाच्या पथकाने भेट देत केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : मृग नक्षत्रात पेरणीयोग्य झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली; मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतात बीज अंकुरलेच नसल्याने खरेदी केलेल्या बियाण्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीनंतर कृषी विभागाच्या चमूने २७ शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देत पंचनामा केला. यात विविध कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे.सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.त्यातील काही शेतकऱ्यांनी कंपन्यांशी जुळवूून घेत बियाणे घेऊन समाधान मानले, तर काहींनी तक्रारी केल्या. त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील शास्त्रज्ञ उंबरकर, तालुका कृषी अधिकारी राधिका बैरागी, मंडळ कृषी अधिकारी ढेंधरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुरारकर, चव्हाण, पर्यवेक्षक दांडेकर, सहाय्यक पांडे आदींनी कृषी विभागाच्या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यात आकोली येथील विशाल गोमासे, तर घोराड येथील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कंपन्यांकडून शेतकऱ्यांची बोळवणसोयाबीन बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पुन्हा मोफत बियाणे पुरवून शेतकºयांची बोळवण करण्याचा प्रकार सुरू आहे मात्र, बियाणे प्रमाणित करणारी टीम याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दखल घेणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही व पथकाने शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसा अहवाल तयार केला. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.बोगस बियाण्यांमुळे आर्थिक फटकाआंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन नामदेव कडू यांनी १० बॅग महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, बराच काळ लोटूनही बियाणे न उगवलेच नाही. यासंदर्भात कडू यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. नुकसानभरपाई देण्यासह बियाणे पास करणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी