शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पेरलं ६० किलो अन् उगवलं ३० किलो

By admin | Updated: November 9, 2014 23:17 IST

एका दाण्याचे दहा करणारा व्यवसाय म्हणजे शेती, असे म्हटल्या जाते; मात्र यंदाच्या खरीप हंगामात याऊलट चित्र वाढोणा येथे दिसून आले आहे. येथील शेतकऱ्याने पेरा करताना ६० किलो सोयाबीन पेरले.

आजी (मोठी) : एका दाण्याचे दहा करणारा व्यवसाय म्हणजे शेती, असे म्हटल्या जाते; मात्र यंदाच्या खरीप हंगामात याऊलट चित्र वाढोणा येथे दिसून आले आहे. येथील शेतकऱ्याने पेरा करताना ६० किलो सोयाबीन पेरले. त्याची कापणी करून उत्पन्न काढण्याची वेळ आली असता त्यातून केवळ ३० किलो सोयाबीनच त्याच्या हाती आले. यामुळे हताश झालेल्या या शेतकऱ्याने रबीत काय करावे असा प्रश्न उपस्थित केला आहे. वाढोणा येथील शेतकरी वजीर पठाण यांच्याकडे दोन एकर शेती आहे़ यात त्यांनी सोयाबीनचा पेरा केला. यात पावसाने दगा दिला़ पहिली पेरणी उगविली नाही. यामुळे त्यांनी दुबार पेरणी केली. ती कशीबशी उगविली. शेतात पीक डोलू लागले़ त्यातच अतिवृष्टी झाली. उभे झालेले पीक पुरते झोपले. यामुळे शेतीला लावलेला खर्च निघेल अथवा नाही अशी चिंता शेतकऱ्याला पडली. काही ना काही नफा होईल असे म्हणत मळणीयंत्राने सोयाबीन काढले. यात सोयाबीनच्या दाण्याचा शोध घेतला असता कुटारच जमा झाले़ एक पोतही उत्पादन झाले नाही़ निघालेल्या सोयाबीनची मोजणी केली असता त्याचे वजन ३० किलो भरले़ शेतात दोन वेळा झालेल्या पेरणीत शेतकऱ्याचे ६० किलो सोयाबीन गेले. तेवढेही त्याच्या हाती आले नाही़(वार्ताहर)