शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

तालुक्यात वाढणार कपाशीचा पेरा

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना

आर्वी : गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टी व गारपिटीमुळे दोन्ही हंगाम नैसर्गिक संकटात सापडले. अतिपावसात सोयाबीन टिकाव धरत नाही. यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा वाढविणार्‍या शेतकर्‍यांनी यंदा कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते. यामुळे यंदा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढण्याचे संकेत आहेत.मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीला प्रथम प्राधान्य दिले होते; पण अतवृष्टीने सोयाबिन पीक वाहून गेले. अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळाला. यामुळे यावर्षी २0१४ च्या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाच्या पीक नियोजनात शेतकर्‍यांनी कपाशी पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. आर्वी तालुका कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी खरीप पीक नियोजन अंदाज तयार केला जातो. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतात कोणते पीक लावणार, याचे नियोजन केले जाते. यावर्षीच्या खरीप नियोजनामध्ये सोयाबीनचा पेरा आर्वी तालुक्यात २३ हजार हेक्टर दाखविण्यात आला आहे. मागील वर्षी हा पेरा २५ हजार २0 हेक्टर होता. कपाशीची लागवड १७ हजार ५00 हेक्टरवर होणार आहे. मागील वर्षी १६ हजार १२0 हेक्टरमध्ये कपाशी लावण्यात आली होती. तूर यावर्षी ७ हजार क्षेत्रावर राहणार असून मागील वर्षी ती ६ हजार ५८0 हेक्टरवर होती तर ज्वारी ४५0 हेक्टर, मुंग १५0 हेक्टर, उडीद १५0 हेक्टरवर पीक नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे दोन्ही हंगाम शेतकरी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी कपाशी पेराचा कमी होता तर भाव मात्र पाच हजारांच्या वर आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव अखेरपर्यंत वाढले नाहीत. चना आणि गव्हाची आराजी व भावातही यावर्षी शेतकर्‍यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने आर्थिक संकट कायम असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)