शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तालुक्यात वाढणार कपाशीचा पेरा

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना

आर्वी : गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टी व गारपिटीमुळे दोन्ही हंगाम नैसर्गिक संकटात सापडले. अतिपावसात सोयाबीन टिकाव धरत नाही. यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा वाढविणार्‍या शेतकर्‍यांनी यंदा कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते. यामुळे यंदा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढण्याचे संकेत आहेत.मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीला प्रथम प्राधान्य दिले होते; पण अतवृष्टीने सोयाबिन पीक वाहून गेले. अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळाला. यामुळे यावर्षी २0१४ च्या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाच्या पीक नियोजनात शेतकर्‍यांनी कपाशी पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. आर्वी तालुका कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी खरीप पीक नियोजन अंदाज तयार केला जातो. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतात कोणते पीक लावणार, याचे नियोजन केले जाते. यावर्षीच्या खरीप नियोजनामध्ये सोयाबीनचा पेरा आर्वी तालुक्यात २३ हजार हेक्टर दाखविण्यात आला आहे. मागील वर्षी हा पेरा २५ हजार २0 हेक्टर होता. कपाशीची लागवड १७ हजार ५00 हेक्टरवर होणार आहे. मागील वर्षी १६ हजार १२0 हेक्टरमध्ये कपाशी लावण्यात आली होती. तूर यावर्षी ७ हजार क्षेत्रावर राहणार असून मागील वर्षी ती ६ हजार ५८0 हेक्टरवर होती तर ज्वारी ४५0 हेक्टर, मुंग १५0 हेक्टर, उडीद १५0 हेक्टरवर पीक नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे दोन्ही हंगाम शेतकरी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी कपाशी पेराचा कमी होता तर भाव मात्र पाच हजारांच्या वर आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव अखेरपर्यंत वाढले नाहीत. चना आणि गव्हाची आराजी व भावातही यावर्षी शेतकर्‍यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने आर्थिक संकट कायम असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)