शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात वाढणार कपाशीचा पेरा

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना

आर्वी : गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टी व गारपिटीमुळे दोन्ही हंगाम नैसर्गिक संकटात सापडले. अतिपावसात सोयाबीन टिकाव धरत नाही. यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा वाढविणार्‍या शेतकर्‍यांनी यंदा कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते. यामुळे यंदा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढण्याचे संकेत आहेत.मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीला प्रथम प्राधान्य दिले होते; पण अतवृष्टीने सोयाबिन पीक वाहून गेले. अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळाला. यामुळे यावर्षी २0१४ च्या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाच्या पीक नियोजनात शेतकर्‍यांनी कपाशी पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. आर्वी तालुका कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी खरीप पीक नियोजन अंदाज तयार केला जातो. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतात कोणते पीक लावणार, याचे नियोजन केले जाते. यावर्षीच्या खरीप नियोजनामध्ये सोयाबीनचा पेरा आर्वी तालुक्यात २३ हजार हेक्टर दाखविण्यात आला आहे. मागील वर्षी हा पेरा २५ हजार २0 हेक्टर होता. कपाशीची लागवड १७ हजार ५00 हेक्टरवर होणार आहे. मागील वर्षी १६ हजार १२0 हेक्टरमध्ये कपाशी लावण्यात आली होती. तूर यावर्षी ७ हजार क्षेत्रावर राहणार असून मागील वर्षी ती ६ हजार ५८0 हेक्टरवर होती तर ज्वारी ४५0 हेक्टर, मुंग १५0 हेक्टर, उडीद १५0 हेक्टरवर पीक नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे दोन्ही हंगाम शेतकरी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी कपाशी पेराचा कमी होता तर भाव मात्र पाच हजारांच्या वर आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव अखेरपर्यंत वाढले नाहीत. चना आणि गव्हाची आराजी व भावातही यावर्षी शेतकर्‍यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने आर्थिक संकट कायम असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)