शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
2
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
3
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
4
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
5
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
6
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
7
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
8
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
9
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
10
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
11
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
12
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
13
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
14
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
15
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
16
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
17
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
18
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
19
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
20
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?

युवकांच्या समस्यांचे निराकरण भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात

By admin | Updated: October 5, 2015 02:17 IST

अमर्याद भोगवादाच्या व्यापामुळे आज युवकांपुढे मोठेमोठी आव्हाने निर्माण केली आहेत.

अंबरनाथ भाई : राष्ट्रीय युवा संमेलनवर्धा : अमर्याद भोगवादाच्या व्यापामुळे आज युवकांपुढे मोठेमोठी आव्हाने निर्माण केली आहेत. मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला आणि आज मंगळावर पोहचण्याच्या योजना बनविण्यात येत आहेत. यात आपण एकमेकांच्या हृदयापासून दूर जात आहोत याचा विसर पडला आहे. युवकांपुढील आव्हानांचे उत्तर भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात आहे. भूतकाळाचा वारसा घेत, भविष्याचे चिंतन करावे लागेल, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ गांधीवादी अंबरनाथ भाई यांनी केले.निवेदिता निलयम युवा केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त येथे आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आजची आव्हाने आणि युवक या विषयावर निवेदिता निलयम युवा केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त तीन दिवसीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ भाई म्हणाले, आज बेरोजगारी ही मोठी समस्या आपणच निर्मित केलेली आहे. पूर्वी अविष्काराची जननी आवश्यतेला मानायचे पण आज अगोदर आविष्कार केला जातो आणि नंतर आवश्यकता बनविल्या जातात. ग्रामउद्योग, लघुउद्योगाशिवाय या देशाला रोजगार मिळू शकणार नाही आणि मोठे उद्योग फक्त पर्यावरणाच्या समस्या आपल्या समोर उपस्थित करतील असेही ते यावेळी म्हणाले. माजी खासदार आणि गांधीवादी नेते डॉ. रामजी सिंह, सामाजिक कार्यकर्ते आर. सुन्दरेशन, गांधी शांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राधा बहन भट्ट, किशन गोरदिया, गीताई मिशनच्या प्रवीणा देसाई, डॉ. बेलखोडे यावेळी उपस्थित होते.भोपालचे अमित कोहली म्हणाले, या संमेलनाच्या निमित्ताने युवकांना समाजाच्या दिशा आणि दशा याबद्दल काय जाणवते याबाबत विस्तृत चर्चा व्हावी, युवक बोलेल, समजेल तेव्हाच देशात विधायक कामाला गती मिळेल आणि त्याचसाठी या केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले. २० राज्यातील ५०० तरूणांनी यात सहभाग घेतलेला आहे. तथा शेकडो स्थानिक युवकांचाही सहभाग आहे, निवेदिता निलयम युवा केंद्राची बाबा आमटे यांच्या भारत जोडे सायकल यात्रेनंतर १९९० मध्ये यात्रेतील काही तरूणांनी प्रवीणा देसाई यांच्या मार्गदर्र्शनामध्ये स्थापना केली. यावर्षी रौप्य वर्षानिमित्त युवकांशी विविध सत्राच्या माध्यमातून युवकांना सामाजिक जबाबदारीसाठी प्रवृत्त करणे आणि सामाजिक कामात सहभागी करून घेणे संमेलनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)