शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या समस्यांचे निराकरण भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात

By admin | Updated: October 5, 2015 02:17 IST

अमर्याद भोगवादाच्या व्यापामुळे आज युवकांपुढे मोठेमोठी आव्हाने निर्माण केली आहेत.

अंबरनाथ भाई : राष्ट्रीय युवा संमेलनवर्धा : अमर्याद भोगवादाच्या व्यापामुळे आज युवकांपुढे मोठेमोठी आव्हाने निर्माण केली आहेत. मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला आणि आज मंगळावर पोहचण्याच्या योजना बनविण्यात येत आहेत. यात आपण एकमेकांच्या हृदयापासून दूर जात आहोत याचा विसर पडला आहे. युवकांपुढील आव्हानांचे उत्तर भारतीय सांस्कृतिक वाड्:मयात आहे. भूतकाळाचा वारसा घेत, भविष्याचे चिंतन करावे लागेल, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ गांधीवादी अंबरनाथ भाई यांनी केले.निवेदिता निलयम युवा केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त येथे आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आजची आव्हाने आणि युवक या विषयावर निवेदिता निलयम युवा केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त तीन दिवसीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ भाई म्हणाले, आज बेरोजगारी ही मोठी समस्या आपणच निर्मित केलेली आहे. पूर्वी अविष्काराची जननी आवश्यतेला मानायचे पण आज अगोदर आविष्कार केला जातो आणि नंतर आवश्यकता बनविल्या जातात. ग्रामउद्योग, लघुउद्योगाशिवाय या देशाला रोजगार मिळू शकणार नाही आणि मोठे उद्योग फक्त पर्यावरणाच्या समस्या आपल्या समोर उपस्थित करतील असेही ते यावेळी म्हणाले. माजी खासदार आणि गांधीवादी नेते डॉ. रामजी सिंह, सामाजिक कार्यकर्ते आर. सुन्दरेशन, गांधी शांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राधा बहन भट्ट, किशन गोरदिया, गीताई मिशनच्या प्रवीणा देसाई, डॉ. बेलखोडे यावेळी उपस्थित होते.भोपालचे अमित कोहली म्हणाले, या संमेलनाच्या निमित्ताने युवकांना समाजाच्या दिशा आणि दशा याबद्दल काय जाणवते याबाबत विस्तृत चर्चा व्हावी, युवक बोलेल, समजेल तेव्हाच देशात विधायक कामाला गती मिळेल आणि त्याचसाठी या केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले. २० राज्यातील ५०० तरूणांनी यात सहभाग घेतलेला आहे. तथा शेकडो स्थानिक युवकांचाही सहभाग आहे, निवेदिता निलयम युवा केंद्राची बाबा आमटे यांच्या भारत जोडे सायकल यात्रेनंतर १९९० मध्ये यात्रेतील काही तरूणांनी प्रवीणा देसाई यांच्या मार्गदर्र्शनामध्ये स्थापना केली. यावर्षी रौप्य वर्षानिमित्त युवकांशी विविध सत्राच्या माध्यमातून युवकांना सामाजिक जबाबदारीसाठी प्रवृत्त करणे आणि सामाजिक कामात सहभागी करून घेणे संमेलनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)