शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कारंजातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.

ठळक मुद्देनागरिकांची आर्त हाक : पाच दिवसांआड होतो पाणीपुरवठा; गृहिणींची होतेय भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : तालुका व विशेषतः शहर पाणी समस्येसाठी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे.१९९८ मध्ये कार नदीवर धरण बांधण्यात आले. पाण्याची समस्या कायम सुटेल असा, आशावाद कारंजावासीयांना वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आल्या आणि गेली. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या काळात खैरी धरण येथून जलवाहिनीद्वारे कारंजा शहरामध्ये व तालुक्यात नारा २२ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ती पाईपलाईन इतकी सदोष होती की वारंवार त्या पाईपलाईन मध्ये समस्या निर्माण होऊन जलसंकट गडद होत होते. आजही कारंजा शहराला कधी ५ तर कधी सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटली फुटली आठ दिवसपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांची लक्ष नाही. त्यांची अनास्था कायम आहे.नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे खैरी धरणावरून जलशुद्धीकरण करून कारंजा शहरात पाणी आणण्यात येईल येईल व दररोज शहरवासीयांना पाणीपुरवठा कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा.कारंजा शहराचा पाणीप्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला असून केवळ मंजुरीसाठी अडकलेला आहे. त्यासाठी माजी आमदार अमर काळे व पालकमंत्री सुनील केदार तयारीला लागलेले आहेत. निवडणुकीपूर्वी हा पाणीपुरवठा मंजुरीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.-कल्पना मस्की, नगराध्यक्ष, नगरपंचायत, कारंजा.

टॅग्स :Waterपाणी