शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

शेतकऱ्यांना दिले सौरपंपाचे गाजर

By admin | Updated: January 3, 2015 01:46 IST

शेतकऱ्यांना शासनाकडून सवलतीपोटी कृषी पंपाची वीज मिळत असे. मात्र सबसिडीचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची सबब पुढे करून शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून वीज कनेक्शन देण्याची बंदीचे आदेश दिले आहे.

वर्धा : शेतकऱ्यांना शासनाकडून सवलतीपोटी कृषी पंपाची वीज मिळत असे. मात्र सबसिडीचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची सबब पुढे करून शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून वीज कनेक्शन देण्याची बंदीचे आदेश दिले आहे. शेतकऱ्यांनी सौर पंपाचा वापर करावा, असे धोरण जाहीर केले असल्याने ही बाब शेतकऱ्यांकरिता अन्यायकारक आहे. ही बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी बळीराजा करीत आहे. याबाबत समता परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे. वीज कनेक्शन बंदीचा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे शेतकऱ्यांवर नाहक साडेसहा लाखांचा बोजा पडणार आहे. शेतकऱ्यांना सवलतीत मिळणारी वीज आता उद्योगांकडे परावर्तीत होणार आहे. शेतकऱ्यांना नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या निर्णयामुळे संकटाची भर पडणार आहे. शेतकऱ्यांना शेती ओलितासाठी सवलतीच्या दरात वीज दिली जात होती. यामुळे उद्योगांना वीज देण्यात अडसर येत असे. नव्या वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यापुढे विजेचे कोणतेही नविन कनेक्शन देवू नये, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे विदर्भातील हजारो शेतकरी वर्षोनुवर्षे शेती ओलितासाठी कधीतरी वीज कनेक्शन मिळेल या प्रतिक्षेत असताना या घोषणेने या आशेवर पाणी फेरले आहे. शेतकऱ्यांना बिन भरवशाच्या व साडेसहा लाख रूपये किंमतीच्या सौरपंपाचा वापर करण्याचे सुचविले आहे.सौरपंपाचे गाजर दाखवुन, यापुढे शेतीला फक्त सौरपंपाचीच परवानगी दिली जाईल, असा तुघलकी निर्णय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लादलेला आहे. साडेसहा लाख रूपये किमतीचा पंप विकत घेण्याची वेळी विदर्भ मराठवाडा येथील शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे कर्जाचा बोजा वाढणार आहे. राज्य शासनाच्या या कृषी विरोधी धोरणाचा महात्मा फुले समता परिषद निवेदनातून निषेध नोंदविण्यात आला. उद्योगांपेक्षाही विजेवर नागरिक व शेतकऱ्यांचाही पहिला हक्क असल्यामुळे ही बंदी अन्यायकारक आहे. वीज कनेक्शन बंदी तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही शासनाकडून होण्याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री यांना एन. नवीन सोना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातुन ही मागणी केली. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, मनोज रूपारेल, किशोर तितरे, सुधीर पांगुळ, संजय म्हस्के, अनिरुध्द गवई यासह कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)