शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

शेतकऱ्यांना दिले सौरपंपाचे गाजर

By admin | Updated: January 3, 2015 01:46 IST

शेतकऱ्यांना शासनाकडून सवलतीपोटी कृषी पंपाची वीज मिळत असे. मात्र सबसिडीचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची सबब पुढे करून शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून वीज कनेक्शन देण्याची बंदीचे आदेश दिले आहे.

वर्धा : शेतकऱ्यांना शासनाकडून सवलतीपोटी कृषी पंपाची वीज मिळत असे. मात्र सबसिडीचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची सबब पुढे करून शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून वीज कनेक्शन देण्याची बंदीचे आदेश दिले आहे. शेतकऱ्यांनी सौर पंपाचा वापर करावा, असे धोरण जाहीर केले असल्याने ही बाब शेतकऱ्यांकरिता अन्यायकारक आहे. ही बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी बळीराजा करीत आहे. याबाबत समता परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे. वीज कनेक्शन बंदीचा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे शेतकऱ्यांवर नाहक साडेसहा लाखांचा बोजा पडणार आहे. शेतकऱ्यांना सवलतीत मिळणारी वीज आता उद्योगांकडे परावर्तीत होणार आहे. शेतकऱ्यांना नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या निर्णयामुळे संकटाची भर पडणार आहे. शेतकऱ्यांना शेती ओलितासाठी सवलतीच्या दरात वीज दिली जात होती. यामुळे उद्योगांना वीज देण्यात अडसर येत असे. नव्या वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यापुढे विजेचे कोणतेही नविन कनेक्शन देवू नये, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे विदर्भातील हजारो शेतकरी वर्षोनुवर्षे शेती ओलितासाठी कधीतरी वीज कनेक्शन मिळेल या प्रतिक्षेत असताना या घोषणेने या आशेवर पाणी फेरले आहे. शेतकऱ्यांना बिन भरवशाच्या व साडेसहा लाख रूपये किंमतीच्या सौरपंपाचा वापर करण्याचे सुचविले आहे.सौरपंपाचे गाजर दाखवुन, यापुढे शेतीला फक्त सौरपंपाचीच परवानगी दिली जाईल, असा तुघलकी निर्णय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लादलेला आहे. साडेसहा लाख रूपये किमतीचा पंप विकत घेण्याची वेळी विदर्भ मराठवाडा येथील शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे कर्जाचा बोजा वाढणार आहे. राज्य शासनाच्या या कृषी विरोधी धोरणाचा महात्मा फुले समता परिषद निवेदनातून निषेध नोंदविण्यात आला. उद्योगांपेक्षाही विजेवर नागरिक व शेतकऱ्यांचाही पहिला हक्क असल्यामुळे ही बंदी अन्यायकारक आहे. वीज कनेक्शन बंदी तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही शासनाकडून होण्याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री यांना एन. नवीन सोना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातुन ही मागणी केली. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, मनोज रूपारेल, किशोर तितरे, सुधीर पांगुळ, संजय म्हस्के, अनिरुध्द गवई यासह कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)