शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

विजेवरील पथदिव्यांजवळ लावले सौर उज्रेचे दिवे

By admin | Updated: May 15, 2014 23:49 IST

शासनाची कुठलीही योजना राबविताना त्यात गैरप्रकार कसा करता येईल, याचे प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधी करताना दिसतात. असाच प्रकार सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे.

सुधीर खडसे -समुद्रपूर

शासनाची कुठलीही योजना राबविताना त्यात गैरप्रकार कसा करता येईल, याचे प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधी करताना दिसतात. असाच प्रकार सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे. सौर उज्रेवरील दिव्यांची खरेदी ग्रा.पं. द्वारे करण्यात आली; पण गरज नसलेल्या ठिकाणी हे दिवे लावून शासनाचा पैसा व्यर्थ करण्यात आला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या या ग्रामपंचायतीने १0 ऑक्टोबर २0१२ आणि ६ नोव्हेंबर २0१२ रोजी ५ नग सौर उज्रेवर चालणारे पथदिवे खरेदी केले. यासाठी १ लाख ७९ हजार ५00 रुपये खरेदी करण्यात आले. हे महागडे दिवे गावात आवश्यक ठिकाणी लावले जातील, असे अपेक्षित होते; पण असे झाले नाही. सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले सौर उज्रेवरील दिवे जेथे गरज नाही, अशा ठिकाणी लावण्यात आले. ग्रा.पं. पदाधिकार्‍यांच्या घरावजळ आधीच विजेवर चालणारे पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या शेजारील परिसरात सौर उज्रेवरील महागडे बल्ब बसविण्यात आलेत. यापैकी एक सौर उज्रेवरील दिवा स्मशानभूमीत लावण्यात आला. हा दिवा गत तीन महिन्यांपासून बंद पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यात; पण तो दिवाही दुरूस्त करण्यात आलेला नाही.

सौर उज्रेवरील पथदिव्यांच्या खरेदीचा माजी सरपंच जयश्री धोटे यांनी सरपंच असताना विरोध केला होता. शिवाय ग्रामसभेनेही या खरेदीला विरोध दर्शविला होता. कमिशनच्या लोभापायी काही राजकीय नेत्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी ही खरेदी करण्यात आली. शिवाय ग्रा.पं. मध्ये असलेल्या या नेत्यांचे हितसंबंध व संख्याबळ अधिक असल्याने ग्रा.पं. च्या आर्थिक परिस्थितीची तमा न बाळगता सौर उज्रेवरील दिव्यांची खरेदी करण्यात आली. या व्यवहारावरही ग्रामस्थ तसेच ग्रा.पं. सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. सौर उज्रेवरील दिव्यांच्या खरेदीची तसेच ते कुठे व कोणत्या कारणातून लावण्यात आलेत, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.