शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वर्ष लोटूनही मिळेना सौर कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले.

ठळक मुद्देयुवा शेतकरी हतबल। वीज महावितरण, सीआरआय एजन्सीची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेकरिता संपूर्ण प्रक्रिया करूनही वर्षभरापासून शेतात कृषिपंप लागला नाही. शेतकरी संबंधित कार्यालयात येरझारा करून आणि विचारपूस करून अक्षरश: थकून गेला. मात्र, यंत्रणेची अनास्था कायम आहे. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न शेतकऱ्याने केला आहे.गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले. यानंतर जयपूरकर यांना भ्रमणध्वनीवर सौरपंप बसविण्याबाबतचा संदेशही प्राप्त झाला. सौर कृषिपंप बसविण्याकरिता शेतकऱ्याने सीआरआय एजन्सीची निवड केली. यावेळी एजन्सीचालक आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून जूनमध्ये सौर कृषिपंप बसवून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सिंचनाची व्यवस्था होणार असल्याने जयपूरकर यांनी शेतात कर्ज काढून अद्रक पिकाची लागवड केली. चार ते पाच लाखांचे उत्पन्न होईल, अशी आशा जयपूरकर यांनी बाळगली. मात्र, सौर कृषिपंप मिळाला नाही. सिंचनाअभावी अद्रकाचे पीक जमिनीतच सडल्याने लागवडीचा खर्च पाण्यात गेला आणि आर्थिक संकट ओढवले. यानंतर जयपूरकर यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, सीआरआय कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौर कृषिपंप लावत असेल तर लावा, असे उद्धट उत्तर दिले; मात्र वर्ष लोटूनही शेतात सौर कृषिपंप लागला नाही. आठ दिवसांत कृषिपंप न लागल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा जयपूरकर यांनी दिला आहे.वीज वितरणचा अनागोंदी कारभारवीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या संपूर्ण व्यवहाराविषयी हा विभाग अनभिज्ञ आहे. केवळ अपडेट घेत आहोत, असे म्हणून अधिकारी वेळ मारून नेत आहेत. जिल्हाधिकाºयांनी या प्रश्नात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी प्रणय जयपूरकर यांनी केली आहे.योजना फसवी असल्याची ओरडसौर कृषिपंपाकरिता जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रक्रिया करीत एजन्सीची निवड केली. मात्र, अद्याप कित्येक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. नेमलेल्या एजन्सीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.बळजबरीने लादली जातेय योजनाशेतकरी वीज वितरणकडे वीजपुरवठ्याची मागणी करीत असताना वीज वितरणचा देण्यास नकार असून सौर कृषिपंप घेण्यास बाध्य केले जात असून बळजबरीने ही योजना शेतकऱ्यांवर थोपविली जात आहे. जिल्हा प्रशासनाचे यावर मात्र, नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक संबंधित यंत्रणांकडून सुरूच आहे.

टॅग्स :agricultureशेती